शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

Lok Sabha Election 2019; मोदी हे संकट नव्हे ती तर राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:34 IST

देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देशरद पवार : इंदिरा गांधींनी निर्माण केला भूगोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर देवीसिंह शेखावत, अरुण गुजराथी, राजेंद्र गवई, अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, आमदार रवि राणा, शरद तसरे, वसुधा देशमुख, केवलराम काळे, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे, पुष्पाताई बोंडे, बबलू देशमुख, सुनील वºहाडे आदी उपस्थित होते.सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच होय.मोदी, फडणवीस म्हणतात - गांधी घराण्याने देशासाठी काय केले? गर्भश्रीमंत असताना जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालविण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल पवार यांनी विचारला.रवि राणा आणि नवनीत राणा यांनी प्रभावी भाषण केले. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, सुनील वºहाडे यांची यावेळी भाषणे झाली. नवनीत यांना निवडून आणण्याचा शब्द प्रत्येकाने दिला.कुठे आहे तुमची५६ इंच छाती?जिनिव्हा करारानुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्याच्या मातापित्यांना सांगावे लागले. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडवले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल पवारांनी केला.अनिल देशमुखांनीसादर केले पुरावे!अनिल देशमुख यांनी ‘राज ठाकरे स्टाईल' भाषण करून रंगत आणली. मोदी किती खोटारडे आहेत, याचे पुरावेच त्यांनी 'डिजिटल स्क्रिन'वर सादर केलेत. हा सूर्य आणि हा जयद्ररथ, असेच ते सारे असल्यामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला. शरद पवार यांनी देशमुखांच्या त्या सादरीकरणाचे कौतुक केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती