शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Lok Sabha Election 2019; मोदी हे संकट नव्हे ती तर राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:34 IST

देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देशरद पवार : इंदिरा गांधींनी निर्माण केला भूगोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर देवीसिंह शेखावत, अरुण गुजराथी, राजेंद्र गवई, अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, आमदार रवि राणा, शरद तसरे, वसुधा देशमुख, केवलराम काळे, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे, पुष्पाताई बोंडे, बबलू देशमुख, सुनील वºहाडे आदी उपस्थित होते.सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच होय.मोदी, फडणवीस म्हणतात - गांधी घराण्याने देशासाठी काय केले? गर्भश्रीमंत असताना जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालविण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल पवार यांनी विचारला.रवि राणा आणि नवनीत राणा यांनी प्रभावी भाषण केले. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, सुनील वºहाडे यांची यावेळी भाषणे झाली. नवनीत यांना निवडून आणण्याचा शब्द प्रत्येकाने दिला.कुठे आहे तुमची५६ इंच छाती?जिनिव्हा करारानुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्याच्या मातापित्यांना सांगावे लागले. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडवले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल पवारांनी केला.अनिल देशमुखांनीसादर केले पुरावे!अनिल देशमुख यांनी ‘राज ठाकरे स्टाईल' भाषण करून रंगत आणली. मोदी किती खोटारडे आहेत, याचे पुरावेच त्यांनी 'डिजिटल स्क्रिन'वर सादर केलेत. हा सूर्य आणि हा जयद्ररथ, असेच ते सारे असल्यामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला. शरद पवार यांनी देशमुखांच्या त्या सादरीकरणाचे कौतुक केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती