शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मोदी हे संकट नव्हे ती तर राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:34 IST

देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देशरद पवार : इंदिरा गांधींनी निर्माण केला भूगोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर देवीसिंह शेखावत, अरुण गुजराथी, राजेंद्र गवई, अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, आमदार रवि राणा, शरद तसरे, वसुधा देशमुख, केवलराम काळे, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे, पुष्पाताई बोंडे, बबलू देशमुख, सुनील वºहाडे आदी उपस्थित होते.सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच होय.मोदी, फडणवीस म्हणतात - गांधी घराण्याने देशासाठी काय केले? गर्भश्रीमंत असताना जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालविण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल पवार यांनी विचारला.रवि राणा आणि नवनीत राणा यांनी प्रभावी भाषण केले. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, सुनील वºहाडे यांची यावेळी भाषणे झाली. नवनीत यांना निवडून आणण्याचा शब्द प्रत्येकाने दिला.कुठे आहे तुमची५६ इंच छाती?जिनिव्हा करारानुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्याच्या मातापित्यांना सांगावे लागले. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडवले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल पवारांनी केला.अनिल देशमुखांनीसादर केले पुरावे!अनिल देशमुख यांनी ‘राज ठाकरे स्टाईल' भाषण करून रंगत आणली. मोदी किती खोटारडे आहेत, याचे पुरावेच त्यांनी 'डिजिटल स्क्रिन'वर सादर केलेत. हा सूर्य आणि हा जयद्ररथ, असेच ते सारे असल्यामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला. शरद पवार यांनी देशमुखांच्या त्या सादरीकरणाचे कौतुक केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती