शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

Lok Sabha Election 2019; मोदी हे संकट नव्हे ती तर राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:34 IST

देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देशरद पवार : इंदिरा गांधींनी निर्माण केला भूगोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर देवीसिंह शेखावत, अरुण गुजराथी, राजेंद्र गवई, अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, आमदार रवि राणा, शरद तसरे, वसुधा देशमुख, केवलराम काळे, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे, पुष्पाताई बोंडे, बबलू देशमुख, सुनील वºहाडे आदी उपस्थित होते.सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच होय.मोदी, फडणवीस म्हणतात - गांधी घराण्याने देशासाठी काय केले? गर्भश्रीमंत असताना जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालविण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल पवार यांनी विचारला.रवि राणा आणि नवनीत राणा यांनी प्रभावी भाषण केले. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, सुनील वºहाडे यांची यावेळी भाषणे झाली. नवनीत यांना निवडून आणण्याचा शब्द प्रत्येकाने दिला.कुठे आहे तुमची५६ इंच छाती?जिनिव्हा करारानुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्याच्या मातापित्यांना सांगावे लागले. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडवले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल पवारांनी केला.अनिल देशमुखांनीसादर केले पुरावे!अनिल देशमुख यांनी ‘राज ठाकरे स्टाईल' भाषण करून रंगत आणली. मोदी किती खोटारडे आहेत, याचे पुरावेच त्यांनी 'डिजिटल स्क्रिन'वर सादर केलेत. हा सूर्य आणि हा जयद्ररथ, असेच ते सारे असल्यामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला. शरद पवार यांनी देशमुखांच्या त्या सादरीकरणाचे कौतुक केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती