शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांची उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:50 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांची यावेळी सोबत होती.महाआघाडीच्या मित्रपक्षांची सभा राजापेठ येथे सकाळी पार पडली. त्यानंतर नवनीत राणा यांनी विविध पक्षांच्या नेत्यांसह बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. महाआघाडीमधील पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.धनंजय मुंडे यांची सभानवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांची राजापेठ येथे पुलाखालच्या मोकळ्या जागेत जाहीर सभा झाली. व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, कमलताई गवई, आमदार रवि राणा, माजी मंत्री वसुधा देशमुख, रिपाइं (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, विश्वासराव देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, पुष्पा बोंडे, किशोर बोरकर, उषा उताणे, वसंतराव साऊरकर, प्रकाश साबळे, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासह युवा स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट), पीरिप (कवाडे गट), खोरिप, बहुजन विकास आघाडी, शेकापसह महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, राजकुमार पटेल, डॉ. राजेंद्र गवई यांचीही भाषणे झाली.आतापर्यंत ३६ उमेदवारांचे अर्जमंगळवारी अखेरच्या दिवशी नीलेश आनंदराव पाटील (आरिपा), नीलिमा नितीन भटकर (पीपीआय), सुनील डेव्हीड डोंगरदिवे (बहुजन मुक्ती पार्टी), पंचशीला विजय मोहोड (बहुजन मुक्ती मोर्चा), अपक्ष रीतेश गुलाबराव गवई, राजू नारायण कुºहेकर, राजू जामनेकर, सुमित्रा गायकवाड, प्रवीण महादेवराव सरोदे, आनंद श्रीराम धवणे, पंकज लीलाधर मेश्राम, लीलाधर तोताराम मेश्राम, लीलाधर शेषराव थोरात, अनिल नामदेवराव जामनेकर, रावसाहेब पुंडलिक गोंडाणे, राजू मानकर, दिनेश गुलाबराव गवई, प्रमोद लक्ष्मणराव मेश्राम, देविदास मनाजी तेलगोटे, किसनराव शेषराव शेंडे, गाझी सदोद्दीन जहीर अहमद आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याव्यतिरिक्त अरुण वानखडे (बसपा) व आनंदराव अडसूळ (शिवसेना) यांनीही पुन्हा मंगळवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.२९ मार्चला माघारउमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ मार्चला सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्याचे अधिकृत सूचक वा निवडणूक प्रतिनिधी यांना २९ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होईल.१०२ जणांनी नेले २१२ अर्जलोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १०२ जणांनी २१२ अर्ज नेले. त्या तुलनेत ३६ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केलेत. १९ मार्चला ३५ व्यक्तींनी ७२, २० ला १७ व्यक्तींनी ४१, २२ ला २७ व्यक्तींनी ६०, २५ ला १९ व्यक्तींनी ३४, तर २६ मार्चला चार व्यक्तींनी पाच अर्ज नेले होते.