शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lok Sabha Election 2019; नेत्यांचाच सुटू लागला तोल, लावायचे कुणाला बोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:11 IST

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परवा जरूडमध्ये सभा झाली.

अमरावती : मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.परवा जरूडमध्ये सभा झाली. युतीच्या प्रचारार्थ ती सभा होती. शिक्षणाने डॉक्टर असलेले आणि अनुभवाने जाणकार झालेले मोर्शीचे भाजप आमदार अनिल बोंडे हे त्या सभेला संबोधित करीत होते. दरम्यान, कुणी एका इसमाने सभेत पाणीटंचाई का सुटत नाही, असा सवाल बोंडे यांना विचारला. बोंडे पाटील खवळले. त्या इसमाला अटक करण्याचे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत निवडून पाठविलेला आपलाच लोकप्रतिनिधी समस्या निर्मूलनाबाबत जाब विचारला म्हणून मतदारराजाला कोठडीत डांबण्याचा आदेश देईल, असे तेथील लोकांच्या मनात चुकूनही आले नव्हते. त्याचमुळे या प्रसंगाचे वेगवान पडसाद उमटले. आपण दिलेल्या मतांवर अनिल बोंडे हे आमदार झालेत. विधानसभेत पोहोचले. सुखसुविधा, अधिकार त्यांना मिळाले. आता पुन्हा युतीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगवा मागायला ते आपल्या दारी आलेत. याचकाने हात जोडून येणे शोभनीय आहे; परंतु याचकच 'राजा'ला सत्तेचा धाक दाखवत असेल तर? हा विचार गावकऱ्यांचा मेंदू जागा करून गेला. जरुडवासीयांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले. लोकशाहीचा महोत्सव पारदर्शकपणे पार पडावा, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाची असताना, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी या एकूणच घटनेची 'पारदर्शक' दखल घेतली की कसे, याबाबत त्या परिसरातील मतदार अनभिज्ञ आहेत.ज्येष्ठ आमदाराला सुनावले खडे बोलदुसरी घटना दर्यापूर तालुक्यातील. प्र्रकाश भारसाकळे या भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याने आनंदराव अडसूळ यांच्या विजयासाठी दर्यापुरात सभेचे आयोजन केले. दर्यापूरचे भाजपचे आमदार रमेश बुंदिले आणि प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी-दर्यापूर पालिकेच्या नगराध्यक्ष हेदेखील त्या सभेला उपस्थित होते. आम्हाला माहिती दिली नाही, बोलविले नाही, या मुद्यावरून तालुका भाजपला ती सभा पक्षसंमत वाटली नाही. त्यांनी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली. सूर्यवंशी धावून गेले. आमदार बुंदिले यांच्या कार्यालयात पत्रपरिषद भरवली. एकदाही आमदारकी निवडून न आलेल्या दिनेश सूर्यवंशी यांनी सहाव्यांदा आमदार असलेले भारसाकळे यांची ज्या शब्दांत कानउघाडणी केली, ते शब्द - ती तºहा पक्षसंमत आहे काय, असा प्रश्न विचारवंतांना पडतोच!आनंदराव अडसूळ यांच्या विजयासाठी बैठकीचे आयोजन करणे हा काय गुन्हा झाला? इतकी वर्षे मी राजकारणात आहे, जिंकण्याचे-जिंकवण्याचे मेरिट आहे, मग पक्षात मला काहीच महत्त्व नसावे काय? बैठकदेखील दिनेश सूर्यवंशी यांनाच विचारून घ्यायची काय? असे प्रश्न भारसाकळे यांचे आहेत. ज्यांच्यासाठी ही बैठक होती, ते आनंदराव अडसूळ नावाप्रमाणे आनंदाने बैठकीत सहभागी झालेत; पण 'सूर्यवंशी' असलेले भाजप जिल्हाध्यक्ष आगीप्रमाणे बरसले. भाजपची संस्कृती, ज्येष्ठांचा सन्मान, पक्षाची प्रतिमा आणि उमेदवाराच्या प्रचाराची लयबद्धता शब्दांच्या त्या दाहकतेमुळे होरपळली, याची चिंता कुणी करायची?कार्यकर्त्यांच्या गर्दीत विचारांच्या धडका होणारच; पण त्याचा कलह होऊ न देता सर्वांनाच सोबत नेण्याचे प्रयत्न नेत्याने करू नयेत का? नेत्यांचे-पदाधिकाऱ्यांचेही मतभेद असणारच. लोकशाहीचे ते सौंदर्यच! पण कार्यकर्त्यांदेखत नेतेच संयम सोडून वागायला लागले, तर बोल तरी कुणाला लावायचे? 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019