शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; खासदारांच्या पीएला जेनेरिक औषधी केंद्र कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.

ठळक मुद्देरवी राणा : स्थानिक शिवसैनिक वाऱ्यावर, अपंगांनाही डावलले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.मुंबईत वास्तव्य असणाºया आनंदरावांनी खासदार होण्यासाठी अमरावतीतून उमेदवारी भरायची, निवडून येण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांची मते वापरायची, त्यांना राबवून घ्यायचे आणि निवडून आल्यानंतर बुलडाण्याच्या खासगी सचिवाचे घर भरायचे; हेच का अमरावतीच्या मातीशी इमान, असा संतप्त सवाल आमदार राणा यांनी केला आहे.अपंग, अंध व मतिमंदांसाठी शासनाकडून तीन टक्के जागा आरक्षित आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या आरक्षित जागेवर जनऔषधी क़ेंद्राला मान्यता मिळवून खासदारांचे खासगी सचिव सुनील भालेराव यांनी डल्ला मारला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोक्याची १२.६० चौरस मीटर जागा सुनील भालेराव यांच्या पत्नी मीनाक्षी भालेराव या प्रमुख असलेल्या आस्था मल्टिपर्पज ह्युमन राइट्स फाउंडेशन (बुलडाणा) या संस्थेला देण्यात आली. तसा करारनामा जिल्हा सेतु समिती (अमरावती) च्या सदस्य सचिवांकडून मीनाक्षी भालेराव यांच्याशी करण्यात आला आहे. ती मोक्याची जागा जुलै २०१७ पासून पुढील पाच वर्षे भालेराव यांच्या संस्थेला प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राकरिता देण्यात आली आहे. ना खासदाराचे, ना त्यांच्या स्वीय सहायकाचे अमरावतीशी नाते आहे, आपुलकी आहे. बेरोजगार, गरीब, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले किंवा विधवा यापैकी कुणालाही त्या औषधी केंद्राने जगविले असते. परंतु, जनतेला मते मागून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या भरवशावर सर्व लाभ घरात अन् चेलेचपाट्यांना द्यायचे, ही आनंदराव अडसुळांची नीती आहे, असा प्रहार आमदार राणा यांनी केला.२२.५० टक्के नफा दरमहा तीन लक्ष उत्पन्नमीनाक्षी भालेराव यांना या जनऔषधी केंद्रातून २२.५० टक्के नफा व महिन्याकाठी तीन लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. या जनऔषधी कें द्राद्वारे १० ते १५ शिवसैनिकांना रोजगार मिळू शकला असता; मात्र तसे न करता केंद्र शासनाकडून ५० हजार रुपये पगार घेणाºया बुलडाणा येथील सुनील भालेराव यांना का देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी आमदार राणा यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती