शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; निवडणूक विभाग जागला तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 01:34 IST

निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगालबोट नाही : प्रत्येक दिवस सतर्कतेचा, महिलांचेही उल्लेखनीय कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.लोकसभेच्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून सुरू असली तरी आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र मतदानाचे पूर्वसंध्यापासून ते इव्हीएम स्ट्रांग रूम येऊन सील करेपर्यंतचे तीन दिवस जिल्हा निवडणूक विभागासह एआरओ स्तरावर जणू परीक्षा घेणारेच ठरले आहेत. लोकशाहीच्या या महाकुभांत कुठेही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया निर्धोक व पारदर्शीपणे पार पडली. यामागे अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाºयांचे टिमवर्क महत्त्वाचे ठरले आहे.मतदानाचे साहित्य वाटपासून धावपळीला सुरूवात झाली. मतदानाचा दिवस यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतदारसंघातून ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रुममध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा निवडणूक विभागच तात्पुरत्या स्वरूपात येथे स्थलांतरित झाला व येथेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. विधानसभानिहाय ईव्हीएम या ठिकाणी ट्रकद्वारे आणण्यात आलेत. या मशीनची मोजणी, किती खराब झाले ते परत आलेत काय, याची पडताळणी, सर्व मशीनची बूथनिहाय मोजणी नंतर सर्व ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रूमध्ये जमा करण्यात आल्यात. यावेळी तगडा सुरक्षा बंदोबस्त या प्रक्रियेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांसह जिल्हा निवडणूक विभागाचे सर्व कर्मचाºयांचे जागरण होत आहे. मात्र, लोकशाहीच्या महोत्सवात कामाचा कुठलाही ताण येवू न देता सर्वजण तत्परतेणे काम करीत आहेत.एक दिवस हक्काची रजानिवडणूक प्रक्रियेत तीन दिवस दिवस-रात्र जे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर होते त्यांना शनिवारी हक्काची रजा राहणार आहे. वास्तविकता असा काही नियम नाही मात्र, असा प्रचलीतपणे सुरू आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी शनिवारी आराम करतील व पुन्हा नव्या जोशात कर्तव्यावर राहतील. मात्र या अवधीत महत्त्वाचे काम असल्यास कार्यलयातदेखील त्यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019