शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मेळघाटच्या विकासाकरिता युतीचा खासदार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:44 IST

मेळघाटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेना-भाजपचाच खासदार निवडून यायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी अचलपूर येथील सभेत केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अचलपूरच्या सभेत नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेना-भाजपचाच खासदार निवडून यायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी अचलपूर येथील सभेत केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अमरावतीसारख्या विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात भाजप-शिवसेना उमेदवाराविरोधात उभा करायला पक्षातील योग्य कार्यकर्ता मिळत नाही; त्यांना हंगामी उमेदवाराला उभे करावे लागते, यातच त्यांच्या पराभूत मानसिकतेचा परिचय येतो, असे अहीर म्हणाले. मेळघाटच्या विकासाकरीता मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या. पूर्वी मेळघाटात अंधाराचे साम्राज्य होते; परंतु धारणी तालुक्यात स्वतंत्र विद्युत उपकेंद्राची निर्मिती केली. चिखलदरा येथे पर्यटकांसाठी स्कायवॉक निर्माण करण्याचे काम सुरू आहे. थेट अमरावती शहरापासून मध्य प्रदेशपर्यंत चारपदरी मार्ग निर्मिती व तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे आगामी काळात मेळघाटचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासोबत अनेक योजना कार्य$ान्वित होणार असल्याचे ना. अहीर म्हणाले.चांगले परिणाम दिसण्यासाठी मोदी सरकारला आणखी अवधी देणे आवश्यक आहे. कारण अनेक योजना तयार असून, त्यांचे कार्यान्वयन तेवढे बाकी आहे. तापी नदीजोड प्रकल्पाबाबत कोणताही अभ्यास नसलेले उमेदवार आदिवासी बांधवांचे माथे भडकविण्याचे काम करीत आहेत. हा प्रकल्प आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारा आहे. सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी मिळणार असल्याने आदिवासी बांधव बागायती शेती करू शकतील. अमरावती जिल्ह्यात दूरपर्यंत या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. ही सर्व विकासकामे होत असल्याने आनंदराव अडसूळ यांना संसदेत पाठविणे आवश्यक असल्याचे ना. अहीर म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती