शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बडनेर्‍यातील मजीप्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकले

By admin | Updated: May 17, 2014 23:14 IST

सलग ७ दिवसांपासून नवीवस्ती परिसरात पाण्याचा एक थेंबही न मिळल्यामुळे या परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.

बडनेरा : सलग ७ दिवसांपासून नवीवस्ती परिसरात पाण्याचा एक थेंबही न मिळल्यामुळे या परिसरातील महिलांनी  जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरळीत न  झाल्यास उपविभागीय अभियंता सोनार यांच्या कार्यालयात ठिय्या देण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.
बडनेर्‍यात दोन टाक्यांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. एक जुन्या वस्तीत तर दुसरी नव्या वस्तीत  पाण्याची टाकी  होती. जुन्यावस्तीतील पाण्याच्या टाकीचे डोम कोसळल्याने या टाकीतून जुन्या वस्तीचा पाणीपुरवठा बंद करण्यात  आला. ही टाकी भुईसपाट करण्याचे काम सुरु आहे. याच ठिकाणी नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे  धूळखात आहे. मागील वर्षभरापासून बडनेर्‍यातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बडनेरावासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 
१२ मे २0१४ पासून बडनेर्‍यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. नव्या वस्तीच्या टाकीतून संपूर्ण बडेनरा  शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या वाढत्या मागणीमुळे जीवन प्राधीकरणाला एकाच टाकीतून  पाण्याचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यामुळे एक दिवस जुन्यावस्तीत तर एक दिवस नव्या वस्तीत पाण्याचा  पुरवठा केला जात आहे. तोदेखील अनियमित होत असल्यामुळे बर्‍याच भागामध्ये पाणी मिळत नाही. गेल्या सात  दिवसांपासून हमालपुरा, गजानन नगर, झिरी परिसराला पाण्याचा पुरवठा बंद आहे. या ठिकाणच्या पाईप लाईनमध्ये  अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. याचाच संताप व्यक्त करीत स्थानिक हमालपुरा परिसरातील  महिलांनी नव्या वस्तीस्थित पाण्याच्या टाकीजवळच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एसटी डेपोच्या मागील बाजूस  असणार्‍या शारदा नगरामध्ये गेल्या एक महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. त्याचप्रमाणे वडरपुर्‍यात  तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. 
चावडी चौक, ब्राम्हणपुरा, बारीपुरा, पवणनगर, मिलचाळ परिसर, नव्यावस्तीतील माळीपुरा या भागात कमी दाबाचा  पाणीपुरवठा होतो. जीवन प्राधिकरणने याचे नियोजन करुन लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा,  अशी मागणी संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता सोनार यांच्या समोर मांडली. पाणी समस्या  तातडीने निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.   (प्रतिनिधी)