शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST

शाळा बंद असल्याने सराव थांबला, ग्रामीण मुलांच्या घरात बैठक व्यवस्था नाही अमरावती : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणातून ...

शाळा बंद असल्याने सराव थांबला, ग्रामीण मुलांच्या घरात बैठक व्यवस्था नाही

अमरावती : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणातून ज्ञानाचे कण वेचून घेतले. मात्र, महत्प्रयासाने मिळविलेला हा माहितीचा खजिना आता परीक्षेत लिहून काढताना विद्यार्थ्यांची त्रेधा उडण्याची शक्यता आहे. कारण वर्षभर प्रत्यक्ष शाळेत बसण्याची आणि लिहिण्याची सवय लॉकडाऊनमुळे सुटली आहे. कोरोनाच्या संकटाने इतर अनेक हानीसोबतच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडविण्याचेही वाईट काम केले आहे.

दरवर्षी प्रत्यक्ष शाळेत बसून शिकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय लागत होती. शाळेतील बाकावर कसे बसावे, हे सांगितले जात होते. शिवाय विद्यार्थ्यांचे वय आणि उंची लक्षात घेऊनच सुंदर हस्ताक्षर निघण्यासाठी मदत होत होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे शाळाच बंद आहे. यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी या पद्धतीत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा भर केवळ सांगणे आणि ऐकणे या दोनच गोष्टीवर राहिला. विद्यार्थी काय आणि कसे लिहित आहेत, हे पाहण्यासाठी शिक्षकांना वाव नव्हता. शिवाय घरातील सोईनुसार आसनव्यवस्था असल्याने हस्ताक्षरांसाठी अनुरूप जागाही मिळत नव्हती. शाळेतील तासिकेप्रमाणे घरातील ऑनलाईन अभ्यासात वेळेचे बंधन नव्हते. त्यामुळे ऐकलेला अभ्यास विद्यार्थी आपल्या सवडीनुसार हवा तेवढा वेळ घेऊ शकत होते. मात्र, त्यांचे हस्ताक्षर तपासणारे कुणीच नव्हते. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडण्यासोबतच लिहिण्याची गतीही मंदावली आहे. त्यामुळे येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा वेळेत लिहिणे शक्य न झाल्यामुळे अपयश पदरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे सराव वाढविला जात आहे.

--------------------------

विद्यार्थ्यांनो हे करा!

१) लिखाणाचा सराव करण्यासाठी येणाऱ्या परीक्षेपूर्वी घरात घड्याळ लावून पेपर सोडवून पाहा. हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करून पहा.

२) प्रश्नपत्रिका सोडविताना किंवा कोणतेही लिखाण करताना आपल्या शारीरिक उंचीनुसार योग्य टेबल आणि खुर्चीचा वापर करावा.

३) दरदिवशी किमान आठ ते दहा पाने मजकूर लिहिण्याचा नियमित सराव करावा. परीक्षेत खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहून काढावी.

-----------------

(फोटो घेणे)

‘‘ ऑनलाईन शिक्षणात हस्ताक्षराकडे लक्ष देण्यासाठी वाव नाही. व्याकरणाचे नियम शिकवू शकलो नाही. प्रत्यक्ष अध्यापनताच ते शक्य आहे. मुले अनुकरणातून लेखन शिकतात.

- सुरेश माेलके, मराठी शिक्षक

------

‘‘ मागील वर्षी अनेक शाळांमध्ये हस्ताक्षर उपक्रम राबविला. मात्र, यंदा शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचता आले नाही. येत्या काळात कटाक्षाने प्रयत्न करू.

- प्रमोद गारोडे, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती

----------------

जाणकार पालकांचे मत

‘‘ यंदा शाळा नसली तरी आम्ही पालकांनी व्हॉट्स‌ॲप ग्रुप करून विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होईल, या दृष्टीने प्रयत्न केला.

- संध्या खांडेकर, बडनेरा.

--------------

ऑनलाईनमध्ये हस्ताक्षरावर लक्ष देणे शक्यच नाही. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना परीक्षेत होणार आहे, शिक्षणातही सातत्य नव्हते.

- माया बांबोडे, अमरावती