शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये १० लाख आदिवासींना ‘खावटी’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

डीबीटीद्धारे दोन हजार रुपयांचे अनुदान, आदिवासी विकास विभागाच्या ३० एकात्मिक प्रकल्प अंतर्गत नियोजन, ७ लाख ३७,३१५ रुपयांचे अनुदान वाटप ...

डीबीटीद्धारे दोन हजार रुपयांचे अनुदान, आदिवासी विकास विभागाच्या ३० एकात्मिक प्रकल्प अंतर्गत नियोजन, ७ लाख ३७,३१५ रुपयांचे अनुदान वाटप

अमरावती : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान लागू केले. त्याअनुषंगाने नागपूर, ठाणे, नाशिक व अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत ३० एकात्मिक प्रकल्प कार्यालय अंतर्गत आतापर्यंत १० लाख १०,६२० आदिवासी कुटुंबीयांना प्रति दोन हजार रुपयांप्रमाणे डीबीटीद्धारे अनुदान देण्यात आले आहे.

‘खावटी’ अनुदानासाठी ११ लाख १८ हजार ५७९ आदिवासींनी नोंदणी केली होती. त्यानुसार १० लाख ९८ हजार ७४० आदिवासींचे आधार कार्ड नोंदणी झाले. अद्यापही १९ हजार ८३९ आदिवासींनी आधार बेस नोंदणी केली नसल्याने ते खावटीपासून वंचित आहेत. ६८ हजार ५७२ आदिवासींचे अर्ज प्रलंबित आहेत. तसेच ४ हजार ८०८ अर्ज प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्रुटीमुळे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ८६२ अर्ज अपर आयुक्तांकडे सुरक्षेच्या अनुषंगाने प्रलंबित असल्याची माहिती आहे. ४ हजार ७७९ आदिवासींचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. खावटी अनुदान वाटपात नाशिक विभाग आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.

---------------------

अपर आयुक्त कार्यालयनिहाय अनुदान वितरण

अमरावती: १ लाख २८ हजार ९३१

नागपूर: १ लाख २३ हजार ५९८

नाशिक: ३ लाख ६ हजार ६५६

ठाणे: १ लाख ७८ हजार १३०

------------------

अनुदान मिळाले; जीवनावश्यक वस्तू केव्हा?

आदिवासी बांधवांना कोरोनात जगण्याचा आधार मिळावा, यासाठी दोन हजार रूपये अनुदान आणि दोन हजार रुपयांचा किराणा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, कोरोना संसर्गामुळे खावटीचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. आदिवासींना घरपोच १२ प्रकारचा किराणा व तत्सम वस्तू पोहचावी लागेल, असे धोरण आहे. परंतु, लालफितशाहीमुळे तेल, चहा, पत्ती, साखर, मसाला, गहू, तांदूळ, डाळ व तत्सम किराणा असे १२ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूपासून आदिवासी वंचित असल्याचे चित्र आहे.

-------------

आदिवासी बांधवांना १२ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन सुरू आहे. वितरण केंद्र, प्रक्रियेबाबत निर्णय व्हायचा आहे.पुढील महिन्यात आदिवासींपर्यंत दोन हजारांचे किराणा साहित्य पोहोचविले जाईल.

- नितीन पाटील (आयएएस) महाव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ