शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बारावीच्या भाषा परीक्षेवर ‘लॉकटडाऊन’चे सावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, ...

अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, रविवार असे दोन दिवस विकेन्ड आहे. त्यामुळे २४ एप्रिल रोजी होणारा भाषा परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात या परीक्षांचे नियोजन करताना प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये परीक्षा केंद्र राहतील, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार अमरावती विभागात पहिल्यांदाच २८३० केंद्रावर बोर्डाने परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी चालविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांना बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे शनिवार २४ एप्रिल रोजी होणारा बारावीचा भाषा पेपर पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी भाषा पेपर पुढे ढकलावा, अशी मागणी केली आहे. बारावीच्या २४ एप्रिल रोजीच्या भाषा पेपर संदर्भात काही बदल होणार का? याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या क्वारंटाईन असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

--------------------

विभागात परीक्षार्थी संख्या

दहावी : १,६४, ६३२

बारावी : १,३७, ५६९

--------------------

दहावी परीक्षेसाठी २५३३ केंद्र

विभागात दहावीच्या एकूण २६६८ शाळा असल्याची नोंद आहे. अगोदर दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्र होते. मात्र, यंदा २५३६ परीक्षा केंद्र असतील. दहावीसाठी एकूण १८२० केंद्र वाढले आहेत. १३२ शाळांना विद्यार्थी संख्या अथवा तांत्रिक कारणांनी परीक्षा केंद्रापासून डच्चू देण्यात आला आहे.

----------------------

बारावीचे १५१४ परीक्षा केंद्र

अमरावती विभागात बारावीच्या एकूण १५७२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१४ शाळांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. अगोदर बारावीचे ५०४ केंद्र होते. यंदा १०१० परीक्षा केंद्र वाढले आहेत. बारावी परीक्षा केंद्रापासून ५८ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे.

---------------