शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

बारावीच्या भाषा परीक्षेवर ‘लॉकटडाऊन’चे सावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, ...

अमरावती : उन्हाळी इयत्ता बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मात्र, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असून शनिवार, रविवार असे दोन दिवस विकेन्ड आहे. त्यामुळे २४ एप्रिल रोजी होणारा भाषा परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यात या परीक्षांचे नियोजन करताना प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये परीक्षा केंद्र राहतील, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार अमरावती विभागात पहिल्यांदाच २८३० केंद्रावर बोर्डाने परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी चालविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी बोर्डाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांना बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे शनिवार २४ एप्रिल रोजी होणारा बारावीचा भाषा पेपर पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी भाषा पेपर पुढे ढकलावा, अशी मागणी केली आहे. बारावीच्या २४ एप्रिल रोजीच्या भाषा पेपर संदर्भात काही बदल होणार का? याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या क्वारंटाईन असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

--------------------

विभागात परीक्षार्थी संख्या

दहावी : १,६४, ६३२

बारावी : १,३७, ५६९

--------------------

दहावी परीक्षेसाठी २५३३ केंद्र

विभागात दहावीच्या एकूण २६६८ शाळा असल्याची नोंद आहे. अगोदर दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्र होते. मात्र, यंदा २५३६ परीक्षा केंद्र असतील. दहावीसाठी एकूण १८२० केंद्र वाढले आहेत. १३२ शाळांना विद्यार्थी संख्या अथवा तांत्रिक कारणांनी परीक्षा केंद्रापासून डच्चू देण्यात आला आहे.

----------------------

बारावीचे १५१४ परीक्षा केंद्र

अमरावती विभागात बारावीच्या एकूण १५७२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१४ शाळांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. अगोदर बारावीचे ५०४ केंद्र होते. यंदा १०१० परीक्षा केंद्र वाढले आहेत. बारावी परीक्षा केंद्रापासून ५८ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे.

---------------