शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

महापालिकेत स्थायी समितीत ‘एन्ट्री’साठी लॉबिंग

By admin | Updated: January 3, 2015 00:22 IST

महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीमधून मार्च महिन्यात आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे.

अमरावती : महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीमधून मार्च महिन्यात आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे. मात्र नव्या आठ सदस्यांची निवड प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करावी लागत असल्याने अनेक इच्छुकांनी आतापासून स्थायी समितीत ‘एन्ट्री’ साठी नेत्यांकडे लॉबिंग सुरु केले आहे. त्यामुळे स्थायी समितीत कोणाची लॉटरी लागेल, हे फेबु्रवारीत कळेल.महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागली की, आर्थिक बाजू भक्कम होते, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे नगरसेवकांची या समितीत जाण्याची चढाओढ राहते. दर आठवड्यात स्थायी समितीची बैठक होऊन प्रशासनाला विकास कामे अथवा खर्चाबाबतच्या प्रकरणांना मंजुरी देण्याचे काम ही समिती करते. स्थायी समितीचा कारभार एकुणच आर्थिकतेच्या विषयी चालत असल्याने अनेक सदस्यांना दुसऱ्या समितीत जाण्याऐवजी याच समितीत प्रवेशासाठी धडपड सुरु राहते. एकदा स्थायी समितीत गेले की, दोन वर्षांची चिंता मिटते. त्यामुळेच बहुतांश नगरसेवक स्थायी समितीला प्राधान्य देतात. अशातच स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले तर सोन्याहून पिवळे अशी प्रतिक्रिया असते. नवीन आठ सदस्यांची निवड प्रक्रिया फेब्रुवारीत होणार असली तरी महापालिकेत नेत्यांना नगरसेवकांनी स्थायी समितीत ‘एन्ट्री’ साठी तगादा लावला आहे. आठ सदस्यांमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य स्थायी समितीत जाणार आहे. त्यानंतर राकाँचे दोन तर शिवसेना, रिपाइं- जनविकास काँग्रेस, बसपा, भाजपाच्या प्रत्येकी एका सदस्यांची वर्णी लागणार आहे.विजयासाठी हवेत नऊ सदस्यफेबु्रवारीत सदस्य निवडीची प्रक्रिया आटोपताच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होईल. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत सभापतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ९ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पुरेसे असून येत्या सभापती पदावर काँग्रेसचा दावा आहे.स्थायी समितीत नव्याने आठ सदस्यांनी निवड होणार आहे. मात्र स्थायीत प्रवेशासाठी लांबलचक यादी असली तरी ज्या नगरसेवकांना काहीच लाभ मिळाला नाही, अशांना फेब्रुवारीत न्याय मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये आसीफ तव्वकल, प्रदीप हिवसे, अरुण जयस्वाल, सुनीता भेले, राष्ट्रवादीतून प्रवीण मेश्राम, विजय बाभुळकर, जयश्री मोरय्या, रिपाइं-जनविकास काँग्रेसमधून राजू मसराम, सुजाता झाडे, भाजपतून तुषार भारतीय, चंदुमल बिल्दानी यांची नावे आघाडीवर आहेत.