शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संसर्गापासून पशुधन कोसोदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रोगाची लागण पाळीव जनावरांना होत नाही. मनुष्यातील विषाणू जनावरात ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रोगाची लागण पाळीव जनावरांना होत नाही. मनुष्यातील विषाणू जनावरात संक्रमण करीत नाही, असे मत तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९ लाख ८८ हजार ४९९ जनावरे कोरोनापासून कोसोदूर (सुरक्षित) राहिली आहेत.

चीनमधून जगभरात कोरोना विषाणू वर्षभरापूर्वीच पसरला. या विषाणू विरुध्दच्या लढा देत आहेत. ऑक्सिजन व बेडसाठी रुग्णांची रोजच ससेहोलपट सुरू आहे. अशा परिस्थितीत माणसांपेक्षा जनावरे आरोग्याचे दृष्टीने साथीच्या रोगापासून सुरक्षित राहिले आहेत. मनुष्याच्या शिंकण्यातून व खोकल्यातून प्राधान्याने कोरोना विषाणूचा प्रसार मनुष्यात होतो. यामुळेच कोरोना रोग वेगाने पसरला गेला. मास्क घातल्याने या रोगाच्या संक्रमणही काही प्रमाणात रोखण्यात यश आले. मनुष्याच्या शिकण्यातून किंवा खोकल्यातून जनावरांना कोरोनाची लागण होऊ शकते का असा प्रश्न अनेक पशुपालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पाळीव जनावरांना कोरोनासारखे आजार झाल्याची एकही घटना अजून तरी पुढे आली नाही. त्यामुळे रोगापासून जनावरे पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

जिल्ह्यातील पशुधन संख्या

गाय_४६२०२३

म्हैस_१२८५८६

शेळ्या_३१२८८९

मेंढ्या_८२६०३

डुकरे_२३८९

एकूण_९८८४९९

कोट

संपूर्ण जगात आणि भारतात सुध्दा आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पाळीव प्राण्यांमध्ये झाल्याची नोंद नाही. पाळीव प्राणी कोरोनापासून सुरक्षित आहेत. मात्र, खबरदारी घेण्याची गरजेचे आहे.

- डॉ.नितीन कुरकुरे,

सहयोगी प्राध्यापक

विकृती शास्त्र विभाग

शासकीय पशुवैधक महाविद्यालय नागपूर

कोट

जिल्ह्यातील ९.८८ लाख पाळीव प्राणी एकदम सुरक्षित आहेत. कोरोनाचा संसर्ग प्राण्यांना होत नाही. सांगर्गिक रोगाचा कुठलाही प्रादुर्भाव नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पाळीव प्राण्यांपासून संक्रमित व्यक्तीने लांब राहावे.

- डॉ.विजय राहाटे,

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

जिल्हा परिषद अमरावती