शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेषातील २६ प्रकल्प प्राधान्य यादीत

By admin | Updated: June 8, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश ..

व्यथा सिंचनाची : ३३ पैकी २६ प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणारअमरावती : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश राज्य शासनाने प्राधान्यक्रम यादीत केला आहे. सिंचन अनुशेषांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील रखडलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी येत्या तीन वर्षांत २६ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या वार्षिक आराखड्यात अमरावतीसह विभागातील ६६ सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण केले जाणार आहेत. सध्या १२० सिंचन प्रकल्प अपूर्ण कामांमुळे रखडून पडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. अमरावती जिल्ह्यातील २६ सिंचन प्रकल्पांची कामे सन २०१८ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजनसुद्धा ठरविले आहे. अनुशेषांतर्गत २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देणे सुरू असलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, निधीचे पुनर्विनियोजन, भूसंपादन, पुनर्वसन वनविभागाची मंजुरी व रिक्त पदे भरणे अशा विविध प्रश्नांचे निराकरण करण्याचे आवाहन शासनासमोर आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेल्यास त्यापासून सिंचनाची सुविधा होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्यास हातभार लागू शकेल. (प्रतिनिधी) प्रकल्पाचे काम संथगतीनेजिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांना निधी देणे आवश्यक आहे. शिवाय यामधील काही सिंचन प्रकल्प केंद्र शासनाने नियंत्रणासाठी वळते करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बऱ्याच सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामध्ये ३३ प्रकल्प अनुशेषांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने मात्र जिल्ह्याचा अनुशेष वाढत आहे.