शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

सिंचन अनुशेषातील २६ प्रकल्प प्राधान्य यादीत

By admin | Updated: June 8, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश ..

व्यथा सिंचनाची : ३३ पैकी २६ प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणारअमरावती : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश राज्य शासनाने प्राधान्यक्रम यादीत केला आहे. सिंचन अनुशेषांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील रखडलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी येत्या तीन वर्षांत २६ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या वार्षिक आराखड्यात अमरावतीसह विभागातील ६६ सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण केले जाणार आहेत. सध्या १२० सिंचन प्रकल्प अपूर्ण कामांमुळे रखडून पडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. अमरावती जिल्ह्यातील २६ सिंचन प्रकल्पांची कामे सन २०१८ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजनसुद्धा ठरविले आहे. अनुशेषांतर्गत २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देणे सुरू असलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, निधीचे पुनर्विनियोजन, भूसंपादन, पुनर्वसन वनविभागाची मंजुरी व रिक्त पदे भरणे अशा विविध प्रश्नांचे निराकरण करण्याचे आवाहन शासनासमोर आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेल्यास त्यापासून सिंचनाची सुविधा होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्यास हातभार लागू शकेल. (प्रतिनिधी) प्रकल्पाचे काम संथगतीनेजिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांना निधी देणे आवश्यक आहे. शिवाय यामधील काही सिंचन प्रकल्प केंद्र शासनाने नियंत्रणासाठी वळते करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बऱ्याच सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामध्ये ३३ प्रकल्प अनुशेषांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने मात्र जिल्ह्याचा अनुशेष वाढत आहे.