शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर

By उज्वल भालेकर | Updated: October 26, 2023 19:07 IST

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा

उज्वल भालेकर, अमरावती: राज्यात ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय आहे, त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही राजाश्रय मिळायला हवे. उसाच्या संदर्भात ज्या प्रकारे नेते आवाज उठवतात. त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीच्या प्रश्नावर एकही नेता आवाज उठवत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार महामोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनवर यलो मोझॅकचा अटॅक, तर कपाशीवर बोंडअळी मुळे यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे; परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला ही रथ यात्रा बुलढाणा येथे पोहोचून या रथयात्रा एल्गार महामोर्चात त्याचे रूपांतर होणार असून विदर्भातील लाखोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी असणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या महामोर्चातून पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत, सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार, तर कपाशीला १२ हजार ५०० भाव, चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व शंभर टक्के पीक विमा लाभ, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सिमेंटचे मजबूत कम्पाउंड, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये पक्षांचे झेंडे बाजूला सारून शेतकरी सहभागी होणारा असल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रशांत अढाऊ, कपिल पडघान, प्रशांत शिरभाते, दिनेश यावले, प्रीती साहू आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती