शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर

By उज्वल भालेकर | Updated: October 26, 2023 19:07 IST

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा

उज्वल भालेकर, अमरावती: राज्यात ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय आहे, त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही राजाश्रय मिळायला हवे. उसाच्या संदर्भात ज्या प्रकारे नेते आवाज उठवतात. त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीच्या प्रश्नावर एकही नेता आवाज उठवत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार महामोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनवर यलो मोझॅकचा अटॅक, तर कपाशीवर बोंडअळी मुळे यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे; परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला ही रथ यात्रा बुलढाणा येथे पोहोचून या रथयात्रा एल्गार महामोर्चात त्याचे रूपांतर होणार असून विदर्भातील लाखोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी असणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या महामोर्चातून पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत, सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार, तर कपाशीला १२ हजार ५०० भाव, चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व शंभर टक्के पीक विमा लाभ, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सिमेंटचे मजबूत कम्पाउंड, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये पक्षांचे झेंडे बाजूला सारून शेतकरी सहभागी होणारा असल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रशांत अढाऊ, कपिल पडघान, प्रशांत शिरभाते, दिनेश यावले, प्रीती साहू आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती