शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर

By उज्वल भालेकर | Updated: October 26, 2023 19:07 IST

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा

उज्वल भालेकर, अमरावती: राज्यात ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय आहे, त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही राजाश्रय मिळायला हवे. उसाच्या संदर्भात ज्या प्रकारे नेते आवाज उठवतात. त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीच्या प्रश्नावर एकही नेता आवाज उठवत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार महामोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनवर यलो मोझॅकचा अटॅक, तर कपाशीवर बोंडअळी मुळे यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे; परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला ही रथ यात्रा बुलढाणा येथे पोहोचून या रथयात्रा एल्गार महामोर्चात त्याचे रूपांतर होणार असून विदर्भातील लाखोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी असणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या महामोर्चातून पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत, सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार, तर कपाशीला १२ हजार ५०० भाव, चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व शंभर टक्के पीक विमा लाभ, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सिमेंटचे मजबूत कम्पाउंड, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये पक्षांचे झेंडे बाजूला सारून शेतकरी सहभागी होणारा असल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रशांत अढाऊ, कपिल पडघान, प्रशांत शिरभाते, दिनेश यावले, प्रीती साहू आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती