शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘सौभाग्य’तून १४ गावांत प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:20 IST

महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.

ठळक मुद्देमहावितरण : 'एससी' वस्त्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुलआमला, बेलोरा हिरापूर, सारसी, पिंपळगाव निपाणी, चांदूर रेल्वे तालुक्यातील कळंबगाव, निंभा दर्यापूर तालुक्यातील शिवर (खु.), धामोडी, रामतीर्थ, शिवर (बु.), नलवडा आदी गावांचा, तर अमरावती तालुक्यातील कापूस तळणी, पिंपरी आणि भातकुली तालुक्यातील निंभा, गावाचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, म्हणजेच सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानात जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील १४ 'एससी' वस्त्यांमध्ये शंभर टक्के वीजजोडणी देण्यात आल्याने गोरगरीब कुटुंबे प्रकाशात आली आहेत.प्रत्येक गावात विशेष मेळावाज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक 'एससी'वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी महावितरण अमरावती परिमंडळाच्या वतीने प्रत्येक गावात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले व लाभार्थ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन १४ ते २२ एप्रिल या आठ दिवसांत जिल्ह्यातील १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये विद्युतीकरण करण्यात आले आहे.