शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी वाहतूक!

By admin | Updated: November 30, 2014 22:55 IST

वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक

अपघात वाढले : नियमांची सर्रास होतेय पायमल्लीअमरावती : वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक दररोज शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लावत आहे. अनियंत्रित व बेभान वाहनचालकांवर नियंत्रण नसल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील ११ महिन्यांत शहरात २४७ अपघात घडले असून त्यामध्ये सुमारे १२५ नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. शहरात ५० हजारांच्यावर वाहनांची संख्या पोहोचली आहे. त्यातच बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढल्याने शहरातील मार्गावर चालणेही कठीण झाले आहे. दररोज शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाचाही पार बोजबारा उडाला आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात असतानाही विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. शहरातील मुख्य चौक राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक, मालविय चौक, गांधी चौक, राजापेठ चौक अशा प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा उडाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांसाठीच बनली शासकीय पार्किंगशहरातील मुख्य बाजारपेठत नागरिकांची गर्दी वाढली आहे. बहुंताश नागरिक वस्तू खरेदीकरिता वाहन घेऊनच बाजारपेठत जातात. मात्र पार्किगची जागा अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक जण व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांसमोर आपले वाहन उभी करतात. ज्या प्रतिष्ठानात नागरिकांना खरेदीकरिता जायचे आहेत, त्याच प्रतिष्ठासमोर वाहन लावण्यास व्यापारी वर्ग वाहने उभी करण्यासाठी परवानगी देतात. अन्यथा दुसऱ्या प्रतिष्ठानात जाणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्या मनाई केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक मार्गावरच वाहने ठेऊन खरेदीसाठी जाताना आढळून येतात. त्यामुळे दरदिवसाला वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते.