शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जीवघेणी वाहतूक!

By admin | Updated: November 30, 2014 22:55 IST

वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक

अपघात वाढले : नियमांची सर्रास होतेय पायमल्लीअमरावती : वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक दररोज शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लावत आहे. अनियंत्रित व बेभान वाहनचालकांवर नियंत्रण नसल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील ११ महिन्यांत शहरात २४७ अपघात घडले असून त्यामध्ये सुमारे १२५ नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. शहरात ५० हजारांच्यावर वाहनांची संख्या पोहोचली आहे. त्यातच बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढल्याने शहरातील मार्गावर चालणेही कठीण झाले आहे. दररोज शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाचाही पार बोजबारा उडाला आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात असतानाही विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. शहरातील मुख्य चौक राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक, मालविय चौक, गांधी चौक, राजापेठ चौक अशा प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा उडाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांसाठीच बनली शासकीय पार्किंगशहरातील मुख्य बाजारपेठत नागरिकांची गर्दी वाढली आहे. बहुंताश नागरिक वस्तू खरेदीकरिता वाहन घेऊनच बाजारपेठत जातात. मात्र पार्किगची जागा अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक जण व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांसमोर आपले वाहन उभी करतात. ज्या प्रतिष्ठानात नागरिकांना खरेदीकरिता जायचे आहेत, त्याच प्रतिष्ठासमोर वाहन लावण्यास व्यापारी वर्ग वाहने उभी करण्यासाठी परवानगी देतात. अन्यथा दुसऱ्या प्रतिष्ठानात जाणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्या मनाई केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक मार्गावरच वाहने ठेऊन खरेदीसाठी जाताना आढळून येतात. त्यामुळे दरदिवसाला वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते.