शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी वाहतूक!

By admin | Updated: November 30, 2014 22:55 IST

वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक

अपघात वाढले : नियमांची सर्रास होतेय पायमल्लीअमरावती : वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक दररोज शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लावत आहे. अनियंत्रित व बेभान वाहनचालकांवर नियंत्रण नसल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील ११ महिन्यांत शहरात २४७ अपघात घडले असून त्यामध्ये सुमारे १२५ नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. शहरात ५० हजारांच्यावर वाहनांची संख्या पोहोचली आहे. त्यातच बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढल्याने शहरातील मार्गावर चालणेही कठीण झाले आहे. दररोज शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाचाही पार बोजबारा उडाला आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात असतानाही विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. शहरातील मुख्य चौक राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक, मालविय चौक, गांधी चौक, राजापेठ चौक अशा प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा उडाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांसाठीच बनली शासकीय पार्किंगशहरातील मुख्य बाजारपेठत नागरिकांची गर्दी वाढली आहे. बहुंताश नागरिक वस्तू खरेदीकरिता वाहन घेऊनच बाजारपेठत जातात. मात्र पार्किगची जागा अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक जण व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांसमोर आपले वाहन उभी करतात. ज्या प्रतिष्ठानात नागरिकांना खरेदीकरिता जायचे आहेत, त्याच प्रतिष्ठासमोर वाहन लावण्यास व्यापारी वर्ग वाहने उभी करण्यासाठी परवानगी देतात. अन्यथा दुसऱ्या प्रतिष्ठानात जाणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्या मनाई केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक मार्गावरच वाहने ठेऊन खरेदीसाठी जाताना आढळून येतात. त्यामुळे दरदिवसाला वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते.