शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

याला जीवन ऐसे नाव!

By admin | Updated: February 15, 2016 00:51 IST

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत.

संदीप मानकर अमरावतीरोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत. शहरीकरणाच्या जीवनशैलीपासून व सुखसुविधेपासून कोसोदूर असलेले हे आदिवासी कुटुंब मिळेल तेथे निवारा शोधून जीवन जगत आहे. यालाच जीवन म्हणायचे का, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम जरिदा, चुर्णी, काटपूर परिसरातील १० ते १५ कुटुंब राजापेठ परिसरातील इलेक्ट्रीकचे केबल टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. वडाळीच्या बांबू केंद्राच्या गेटजवळ त्यांनी निवारा शोधला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तात्पुरत्या पालाचे घर बांधलेले व तेथे राहत असलेले देवीदास अखंडे व संजू मावस्कर यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात श्रीमंती जाणवत होती. भविष्याची चिंता नाही, गेलेल्या वेळेची फिकीर नाही. ते सांगतात बस २०० ते ३०० रुपये रोज कमवाला व दिवस भागला व पोटाची खळगी भरली की संपले जीवन. देवीदासला एक मुलगी दोन मुले, स्थलांतरित झाल्यामुळे शिक्षण, आरोग्याची सोय नाही. बाहेरुन पाणी आणावे लागते. ज्या ठिकाणी ते राहतात, तेथे सर्पदंश किंवा इतर प्राण्यांचा भय मनात नाही. चूल पेटवून दोन घास खाण्याचे व दोन्ही टाईम दिवसभर कामावर जायचे येथे पालाच्या घरात १५ कुटुंब असेच जीवन जगत आहेत. शासनाने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लाख प्रयत्न सुरू आहे. पण पदरी मात्र अपयशच! साहब, जंगल मे सोना है, इसमेही पुरी जिंदगी निकल गई. उपरवाला साथ मे है, असे स्मितहास्य देत, पोटासाठी जगावे लागते, असे म्हणतात. मेळघाटात शासनाच्या सुविधा मिळत नाही, रोजगारपण नाही, बँकेत खाते काढण्यासाठी चप्पल घासावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात एकांतवासाने हे जीवन जगत.