शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

बंजर माटी में मृत्यू से जीवन खिंचा है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:05 IST

आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य अधिकारी : ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र, लढण्याचे धैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर/ येवदा : आपण सुरुवातीपासून कोविड-१९ शी लढाईत सर्वांत पुढच्या आघाडीवर होतो. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना, ही लढाई निकराने व शर्थीने लढणे गरजेचे वाटू लागले आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून एक दिवस या महामारीवर निश्चित मात करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशा या कोरोनायोद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमाबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकापासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व आशाताईंचा गौरव केला आहे. बाधितांची वाढती संख्या पाहता, आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई शर्थीने लढणे आवश्यक झाले आहे. प्रत्येक जण आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या निरोगी जीवनासाठी त्यांच्या मनावर दक्षता त्रिसूत्री बिंबवणे,  जीवनशैलीचा भाग होण्यासाठी ती सतत सांगत राहणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी पाठविणे आणि पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार मिळवून देत संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करवून घेण्यासाठी तालुका कार्यालयांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. हे काम ‘आशाताईं’ कडून नियमितपणे होत असल्याने त्यांचा या लढाईतील योगदान मोलाचे आहे. पुढील लढाईही आम्ही शर्थीने आणि एकजुटीने लढू व एक दिवस कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्वास देत डॉ. रणमले यांनी लिखित पत्रातून आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

असे केले आवाहन‘हम उस माटी के वृक्ष नही, जिसको नदीयों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यू से जीवन खिंचा है, मिटनेवाला नाम नही हमारा, एक दिन जरूर महामारीसे जितेंगे’, असा निर्धार व्यक्त करीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना कोरोना लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या