शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

गढूळ पाणी शुद्ध करण्यास जीवन प्राधिकरण अपयशी

By admin | Updated: August 12, 2015 00:10 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तुरटी, क्लोरीनचे डोज वाढविले : शहरात सर्वत्र दूषित पाण्याचा पुरवठावैभव बाबरेकर अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्वच परिसरात गढूळ पाणी पुरवठ्यामुळे पोटाचे विकार वाढल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढली असून जीवन प्राधीकरण गढूळ पाणी शुध्द करण्यात उपयशी ठरले आहेत. हे वास्तव आजच्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच स्थिती उदभवली असून पुन्हा जीवन प्राधिकरणाकडून गढूळ पाणीपुरवठा सुरु झाला आहे. गढूळ पाण्याबाबत तक्रारी घेऊन अनेकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दारे ठोठावली आहेत. मात्र, पाण्यात गढूळता नसून पाण्याचा केवळ रंग गढूळ दिसत असल्याची अफलातून उत्तरे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देत आहे. गढूळ पाण्याबाबत 'लोकमत' प्रतिनिधीने काही डॉक्टर व तज्ज्ञ मंडळीशी चर्चा केली आहे. त्यांनाही गढूळ पाणी असो किंवा गढूळ रंग असो, दोन्ही स्थितीतील पाणी मानवी शरीररासाठी घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या ८ ते १० लाखांच्या जवळपास आहे. शहरात जीवन प्राधिकरणाचे सुमारे ८० हजार ग्रांहक आहेत. दररोज नागरिकांना ९५ दशलशलिटरचा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शुध्द पाणीपुरवठ्याची हमी देणारे जीवन प्राधीकरण आजच्या आधूनिक युगात पाण्यातील गढूळताही नाहिसी करू शकत नाहीत, ही बाब आश्चर्याचीच आहे. शहरात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यातच जीवन प्राधीकरणाकडूनही गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. गढूळ पाण्यात हायड्राआॅक्साईड व आयरन बॅक्टेरियाविविध ठिकाणच्या पाण्यासोबत रासायनीक खतातील रसायन वाहत येऊन पाणी धरणात जमा होते. त्यामध्ये असलेल्या सल्फेट रसायनापासून हायड्राआॅक्साईड तयार होते. ते लवकर स्थिर होत नाही. त्यातच पाण्यात आयरन बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. ते मानवी शरिरासाठी घातक ठरते. धरणातील पाण्याचे शुध्दीकरण केल्यावरही हायड्राआक्साईड व आयरन बॅक्टेरियाचे काही प्रमाण कायमच असते. त्यामुळेच पाण्याचा रंग गढूळ होते. मात्र, पाण्यात गढूळता अधिक असल्यास पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख आ.श.अस्वार यांनी दिली. गढूळ पाणी घेऊन नागरिकांची मजीप्राकडे धावशहरातील बहूतांश भागात नळाला गढूळ पाणी येत असल्यामुळे अनेक नागरिक गढूळ पाणी घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या दारे ठोठावत आहेत. मात्र, पाण्याला केवळ गढूळ रंग आहे, तो गढूळ रंग नाहिसा केला जावू शकत नाही, असे उत्तरे नागरिकांना देण्यात येत आहे. मंगळवारी भाजीबाजार परिसरातील विशाल गणोरकर यांनी बॉटलीत गढूळ पाणी घेऊन मजीप्रा अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यांनी आणलेल्या पाण्यात गढूळतेचे प्रमाण अधिक होते.