शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपल्या नातेवाइकांना किंवा इतरांना काही संदेश द्यायचा ...

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड

ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपल्या नातेवाइकांना किंवा इतरांना काही संदेश द्यायचा असेल तर पत्राच्या माध्यमातून दिला जात होता; मात्र मोबाईलच्या क्रांतीमुळे पत्रपेटी काळाच्या पडद्याआड गेली असल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामीण भागामध्ये पोस्टामार्फत पत्रपेटी एखाद्या भिंतीवर लावल्या जात होती. त्या पत्रपेटीमध्ये गावातील नागरिक महत्त्वाचा संदेश असो किंवा कोणताही व्यवहार असो पत्राच्या माध्यमातून केला जात होता. व गावातील नागरिकसुद्धा आपल्या नातेवाइकांची पत्र येईल, म्हणून मोठ्या आशेने पोस्टमनची वाट पाहत असे. परंतु आता प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आल्याने पत्राकडे कुणीही संदेश देत नसल्याचे समजते.

रक्षाबंधनच्या काळामध्ये राखी पाठवण्यासाठी प्रत्येक बहीण या पत्रपेटीमध्ये आपल्या भावाला राखी पाठवत असे. आता मात्र स्पर्धेच्या युगामध्ये कुणीही असा व्यवहार करत नसल्याचे एकंदरीत चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

सुरवातीच्या काळात अत्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचवायचा असला तर तार ही सेवा होती; परंतु ती सेवा काही वर्षांपासून बंद पडली आहे.

पोस्टामार्फत अनेक विकासात्मक क्रांती केल्या गेली आहे. अनेक सेवा यामध्ये सरकारने विकसित केल्या असल्या; परंतु पत्रव्यवहार मात्र दुर्लभ झाल्याचे दिसत आहे.

सर्व नागरिकांचे व्यवहार आता मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने जुन्या सेवा दुर्लभ होतील काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.