शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री चांदूरबाजारात पत्रपरिषद : बच्चू कडू यांनी दिली माहिती

By admin | Updated: February 4, 2016 00:25 IST

सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था पूर्णामाय अपंग व पुनर्वसन केंद्र इमारतीच्या उद्घाटनाला ५ फेब्रुवारी रोजी टोंगलापूर मासोद, कुरळपुर्णा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

अमरावती : सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था पूर्णामाय अपंग व पुनर्वसन केंद्र इमारतीच्या उद्घाटनाला ५ फेब्रुवारी रोजी टोंगलापूर मासोद, कुरळपुर्णा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ हजार अपंग बांधवांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी भूमिपुत्र फाऊंडेशनचा, शुभारंभ कृषी पर्यटन केद्राचे भूमिपूजन व श्री संत गुलाबराव महाराज कृत्रिम अवयव निर्मिती केंद्राचे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विश्रामगृह अमरावती येथे बुधवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत आ. बच्चू कडू यांनी दिली. पूर्णामाय अपंग - अनाथ पुनर्वसन केंद्राच्यावतीने अपंग, अनाथ मुकबधीर, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण, क्रीडा, आरोग्य सेवा, उद्योग कर्मशाळा रोजगार देऊन त्यानचे संपूर्ण पुनवर्सन केल्या जाते असते आ. कडू यांनी सांगितले. पत्रपरिषदेला धीरज जयस्वाल, जोगेंद्र मोहड, नीलेश सावरकर, बबलू माहुरकर, प्रदीप निमकर्डे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)२५ अपंग बांधवांना धनादेश देणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी धनादेश वाटप करण्यात येणार आहे. २५ एकराचा जागेवर अपंगपूर्णा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथे अपंगांना शिक्षण आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे. याकरिता आतापर्यंत २ कोटी निधी खर्च झाला झाला आहे.बायोमेट्रिक पद्धतीने मिळणार पैसेश्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना पैसे मिळणार आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊन त्यांना एटीएमसारखे काढता येणार आहेत. गाडगेबाबा अनाथ व अपंग योजना शासनाकडे प्रस्तावितश्री संत गाडगेबाबांच्या नावे, गाडगेबाबा अनाथ व अपंग योजना शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेतून अपंग व अनाथांना हक्काचे घरकुल मिळणार आहे. यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगितले. विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ७५० कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० कुटुंबांचे अर्ज निकाली निघेल. प्रहार हा सामाजिक पक्ष अनेक आंदोलन यशस्वी करुन न्याय मिळाला.