शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

बुधवारपासून ‘कॉलेज चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग ओसरताच शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता शासनाने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी संस्थाचालकांना विद्यार्थी सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, हे विशेष. विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. संस्थाचालक कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत आता नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. मात्र, दिवाळीपूर्वी कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही बाब आनंदाची ठरली आहे. 

कोणत्या महाविद्यालयात काय काळजी घेतली जातेय? महाविद्यालये उघडण्याचा निर्णय झाला. त्याबाबत गाईडलाईन पाळले जाईल. सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे पालन, नो मास्क, नो एन्ट्री, अनावश्यक गर्दी टाळली जाईल.- आराधना वैद्य, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. जिल्हाधिकारी जे काही गाईडलाईन देतील, त्याचे पालन केले जाईल. वर्गखोल्यांची क्षमता बघून नियोजन केले जाईल. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे नियोजनाला प्राधान्य असेल.-राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आरडीआयके व केडी, बडनेरा.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता वरिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी पुन्हा प्रवाहात येतील. हा निर्णय कोरोनाची दुसरी लाट ओसरताच व्हायला हवा होता. -राजेश वाटाणे, विद्यार्थी, केशरबाई लाहोटी महाविद्यालय

राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून महाविद्यालयात ये-जा केली जाईल. गत दीड वर्षापासून कॉलेज बघितले नव्हते. आता दिवाळीपूर्वीच महाविद्यालये सुरू होणार असल्याने आनंद आहे. - पराग वानखडे, विद्यार्थी, विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी

 

टॅग्स :collegeमहाविद्यालय