शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बुधवारपासून ‘कॉलेज चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग ओसरताच शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता शासनाने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी संस्थाचालकांना विद्यार्थी सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, हे विशेष. विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात एकूण ११८ महाविद्यालये असून, २ लाख २५ हजारांच्या घरात विद्यार्थिसंख्या आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे.  मुळात किती विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, तथापि प्रवेश अमरावती शहरातील महाविद्यालयात आहे, अशा विद्यार्थ्यांचे लसीकरणाची काय स्थिती असेल, हे तूर्त कळू शकले नाही. मात्र, राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. संस्थाचालक कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत आता नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. मात्र, दिवाळीपूर्वी कॉलेज सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही बाब आनंदाची ठरली आहे. 

कोणत्या महाविद्यालयात काय काळजी घेतली जातेय? महाविद्यालये उघडण्याचा निर्णय झाला. त्याबाबत गाईडलाईन पाळले जाईल. सॅनिटायझेशन, शारीरिक अंतराचे पालन, नो मास्क, नो एन्ट्री, अनावश्यक गर्दी टाळली जाईल.- आराधना वैद्य, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. जिल्हाधिकारी जे काही गाईडलाईन देतील, त्याचे पालन केले जाईल. वर्गखोल्यांची क्षमता बघून नियोजन केले जाईल. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे नियोजनाला प्राधान्य असेल.-राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आरडीआयके व केडी, बडनेरा.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता वरिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी पुन्हा प्रवाहात येतील. हा निर्णय कोरोनाची दुसरी लाट ओसरताच व्हायला हवा होता. -राजेश वाटाणे, विद्यार्थी, केशरबाई लाहोटी महाविद्यालय

राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून महाविद्यालयात ये-जा केली जाईल. गत दीड वर्षापासून कॉलेज बघितले नव्हते. आता दिवाळीपूर्वीच महाविद्यालये सुरू होणार असल्याने आनंद आहे. - पराग वानखडे, विद्यार्थी, विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी

 

टॅग्स :collegeमहाविद्यालय