शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल

By admin | Updated: May 13, 2015 00:36 IST

सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत,

चांदूररेल्वे : सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत, त्याला चार हजार फुटाचे घर, ज्याच्या घरी १५ कुटुंब आहे त्याला दोन हजार फुटाचे घर ही मोठी दरी आहे. लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल, असे प्रतिपादन जनता दलाचे नेते पांडुरंग ढोले यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर झालेल्या घरकूलपात्र लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.चांदूररेल्वे नगरपरिषद अंतर्गत घरकूल योजना सुरू होऊन १५ वर्षे झालीत. गरिबांना घरकूल मिळावे ही संकल्पना असताना मागील १० वर्षांपासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थी यापासून वंचित राहिले आहे. त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनता दलाचे माजी आमदार पांडुरंग ढोले, आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी, भाकपचे विनोद जोशी, माकपचे रामदास कारमोरे, नगरसेवक मेहमुद हुसैन, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ भैसे यांची उपस्थिती होती.आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी आपल्या भाषणात म्हटले की, नवीन सरकार दिशाभूल करीत आहे. याकडे जनतेने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाला घराची अपेक्षा आहे. ओबीसी व खुला प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुलाची योजनाच नाही. शहरात ११५० लोकांचे सर्वे केले. त्यांना घराची अत्यंत गरजेचे आहे. त्यांना घर मिळाले पाहिजे, असे म्हटले. यावेळी लाभार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांना घरकूल मागणीचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)