शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे..!”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

फोटो - राष्ट्रसंत १४ पी कॅप्शन - १९५० मध्ये ध्वजारोहण करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज (मोझरी) : १५ ऑगस्ट ...

फोटो - राष्ट्रसंत १४ पी

कॅप्शन - १९५० मध्ये ध्वजारोहण करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

गुरुकुंज (मोझरी) : १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तोफांच्या गडगडाटात, रोषणाईच्या झगझगाटात नि भारतमातेच्या बुलंद जयघोषात अशोकचक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज फडकू लागला होता आणि त्याला पंडित नेहरूंनीच नव्हे, तर ब्रिटिशांचे प्रतिनिधी माऊंटबॅटन यांनीसुद्धा सलामी दिली होती. सारा भारत यावेळी जागा होता. विदर्भातील १९४२ च्या क्रांतीचे प्रणेते, स्वातंत्र्य सेनानी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेवामंडळाच्या शाखांना स्वातंत्र्यदिन विधायक कार्यरूपाने कसा साजरा करावा, या बाबतचा संदेश पाठविला होता. यात रामधून, सामुदायिक प्रार्थना, सूतयज्ञ, कुस्त्यांची दंगल, मर्दानी खेळ, अस्पृश्यासाठी विहिरी-देवळे खुली करणे आदींचा समावेश होता

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जत संस्थानमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते घेण्यात आला होता. यावेळी ६० हजार लोकांच्या उपस्थितीत ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे गीत तिथेच रचून महाराजांनी सर्वांकडून गंभीरपणे वदवून घेतले. १५ ऑगस्टच्या रात्री वंदनीय महाराजांचा कार्यक्रम श्रीक्षेत्र पंढपूरला होता. सर्वांनी नव्या उमेदीने कामाला लागावे नि भारताला स्वर्गतुल्य बनवावे, असे त्यांना उत्कटतेने वाटत होते.

भारताच्या सुपुत्रांनो, उठा! घ्या राज्य हे हाता!

भाग्य उदयास आलेले, बाणू द्या अंगीच्या रक्ता!!

स्वातंत्र्यदेवतेचे हे पुजारी म्हणजे राष्ट्राचे नेते,सत्ताधिकारी यांना सुराज्यनिर्मितीच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याबरोबरच नव्या भारतातल्या नव्या पिढीत नवचैतन्य ओतण्याचे कार्य महाराज निरंतर करीत होते. याचा प्रत्यय गावोगावी प्रात:काळच्या ‘रामधून’मधील शिस्तबद्ध बालसेनेच्या जोशातून नि घोषातून सर्वांनाच आगळ्या रूपात येत होता. तो घोष होता

प्यारा हिंदुस्थान है, गोपालों की शान है!

वीरों का मैदान, जिसमे भक्तों के भगवान है!

‘आजच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेऊन चारित्र्यवान, शीलवान, बलवान असा समाज निर्माण करण्याची स्वप्ने तुम्ही उराशी बाळगली पाहिजे. तुम्ही राष्ट्राचे भावी भाग्यविधाते आहात, ही गोष्ट लक्षात असू द्या,’असे त्यावेळी महाराजांनी सांगितले होते.

(साभार- जीवनयोगी खंड ६)

140821\img-20210814-wa0002.jpg

photo