शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

बांधावर खतपुरवठा योजनला शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 5, 2014 23:20 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही.

अमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही. यंदा तर बांधावर खत पुरवठ्याची मागणीच नोंदविली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खताचा थेट गावातच पुरवठ्यासाठी बांधावर खत पुरवठा योजना सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विदर्भ को-आॅप. मार्केटिंग सोसायटी यांच्या मार्फत शेतकरी गटाला ४५० मे टन खताचा बांधावर पुरवठा केला होता. त्यानंतर याच वर्षी रबी हंगामात मागणी नसल्याने निरंक राहिला तर सन २०१३ मधील खरीप हंगामात ९७.५० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. रब्बी हंगाम मात्र निरंक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवात झाली. पाऊस नसल्याने बाजार थंड आहे. पण यावर्षी शासनाकडे खताचा बंफर स्टॉक नसला तरी खतसाठा जिल्ह्यात मुबलक आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी समूह गटाकडे कुठल्याही गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताची मागणी नोंदविली नाही. परिणामी शेतकरी गटानेही रासायनिक खतपुरवठा करणाऱ्या नोडल अधिकारी यांच्याकडेही सध्या तरी रासायनिक खताची बांधावर पुरवठ्यासाठी मागणी नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बांधावर खत पुरवठ्याची मागणी शेतकरी गटाकडून झाल्यास रासायनिक खतपुरवठा केला जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु मागील दोन वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील या योजनेचे चित्र पहाल्यास योजनेला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला असून भविष्यात ही योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत.