शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

बांधावर खतपुरवठा योजनला शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 5, 2014 23:20 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही.

अमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही. यंदा तर बांधावर खत पुरवठ्याची मागणीच नोंदविली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खताचा थेट गावातच पुरवठ्यासाठी बांधावर खत पुरवठा योजना सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विदर्भ को-आॅप. मार्केटिंग सोसायटी यांच्या मार्फत शेतकरी गटाला ४५० मे टन खताचा बांधावर पुरवठा केला होता. त्यानंतर याच वर्षी रबी हंगामात मागणी नसल्याने निरंक राहिला तर सन २०१३ मधील खरीप हंगामात ९७.५० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. रब्बी हंगाम मात्र निरंक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवात झाली. पाऊस नसल्याने बाजार थंड आहे. पण यावर्षी शासनाकडे खताचा बंफर स्टॉक नसला तरी खतसाठा जिल्ह्यात मुबलक आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी समूह गटाकडे कुठल्याही गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताची मागणी नोंदविली नाही. परिणामी शेतकरी गटानेही रासायनिक खतपुरवठा करणाऱ्या नोडल अधिकारी यांच्याकडेही सध्या तरी रासायनिक खताची बांधावर पुरवठ्यासाठी मागणी नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बांधावर खत पुरवठ्याची मागणी शेतकरी गटाकडून झाल्यास रासायनिक खतपुरवठा केला जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु मागील दोन वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील या योजनेचे चित्र पहाल्यास योजनेला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला असून भविष्यात ही योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत.