शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बांधावर खतपुरवठा योजनला शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 5, 2014 23:20 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही.

अमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०१२ मध्ये सुरू केलेल्या बांधावर खतपुरवठा योजनेला जिल्ह्यात उतरती कळा आली आहे. मागील दोन वर्षांपासून या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिला नाही. यंदा तर बांधावर खत पुरवठ्याची मागणीच नोंदविली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खताचा थेट गावातच पुरवठ्यासाठी बांधावर खत पुरवठा योजना सुरू केली. पहिल्या वर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विदर्भ को-आॅप. मार्केटिंग सोसायटी यांच्या मार्फत शेतकरी गटाला ४५० मे टन खताचा बांधावर पुरवठा केला होता. त्यानंतर याच वर्षी रबी हंगामात मागणी नसल्याने निरंक राहिला तर सन २०१३ मधील खरीप हंगामात ९७.५० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. रब्बी हंगाम मात्र निरंक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवात झाली. पाऊस नसल्याने बाजार थंड आहे. पण यावर्षी शासनाकडे खताचा बंफर स्टॉक नसला तरी खतसाठा जिल्ह्यात मुबलक आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी समूह गटाकडे कुठल्याही गावातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताची मागणी नोंदविली नाही. परिणामी शेतकरी गटानेही रासायनिक खतपुरवठा करणाऱ्या नोडल अधिकारी यांच्याकडेही सध्या तरी रासायनिक खताची बांधावर पुरवठ्यासाठी मागणी नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बांधावर खत पुरवठ्याची मागणी शेतकरी गटाकडून झाल्यास रासायनिक खतपुरवठा केला जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु मागील दोन वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील या योजनेचे चित्र पहाल्यास योजनेला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला असून भविष्यात ही योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत.