शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

अनुदानित सौर कृषिपंप योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: October 1, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत.

शेतकऱ्यांमध्ये भीती : जनजागृती होणे अत्यंत गरजेचेलोकमत विशेषअमरावती : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत. मात्र या चांगल्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र उघड झाले आहे. एकदा सौर कृषिपंप घेतल्यास महावितरणकडून विजेवर चालणाऱ्या पंपासाठी जोडणी मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सौर कृषिपंप योजनेमधून सौर कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्याला या योजनेंतर्गत १७०० शेतकऱ्यांना सौर कृषिपंप वितरणाचे लक्ष्य देण्यात आले असून सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ७१ शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडे प्राप्त झाले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे शेतकरी लाभार्थ्यांना सौरपंपाच्या एकूण किंमतीमधील ५ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. सौर ऊर्जेवरील कृषिपंपामुळे भारनियमन कमी दाब किंवा पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही. एकूण किमतीच्या पाच टक्के रकमेत सौर ऊर्जेवरील कृषिपंप मिळणार आहेत. त्याचे दरमहा किंवा वार्षिक कोणतेही देयके येणार नाही. ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसोबत ज्या गावात पारंपरिक विद्युतीकरण झालेले नाही, त्या गावातील शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही योजना सामान्यांना लाभदायी आहे. (प्रतिनिधी)या अटीमुळे झाला घोळसौर कृषिपंप घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी यापूर्वी शेतात वीज जोडणी घेतलेली नसावी. जर त्यांनी वीज जोडणी घेतली असेल तर त्यांना सौर कृषिपंप घेता येणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जाणार आहेत त्यांना महावितरणकडून वीज जोडणी मिळणार नाही, अशी अट महावितरणने घातली आहे. नेमक्या याच अटीमुळे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास धजावत नाहीत. सौर ऊर्जेवरील कृषिपंप बंद पडल्यास अपेक्षित कार्यान्वयन न झाल्यास आपली परिस्थिती ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी होईल. सौर कृषिपंप बंद पडेल व त्यानंतर महावितरणकडून वीज जोडणीसुद्धा मिळणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे आणि त्यामुळेच मार्च २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ३ लाख २४ हजार रूपये किमतीच्या ३ एचपी सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना १६,२०० रूपये, ३ एचपी डीसी पंपासाठी २०,२५० रूपये भरावे लागणार आहेत.संबंधित एजंसीला आम्ही सौर कृषिपंप लावतेवेळी फक्त ८० टक्के रक्कम देणार आहोत. शेतकऱ्यांकडून आलेल्या अनुभवानंतर उर्वरित रक्कम त्या एजंसीला देण्यात येईल. सौर कृषिपंप बंद पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी कुठलीही भीती बाळगू नये.- निलिमा गावंडे, उपअभियंता, महावितरण, अमरावती.