शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:12 IST

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील ...

अनास्था : पाच वर्षांत ६० हजार मतदार वाढूनही यंदा टक्का ‘जैसे थे’अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १३ लाख ९० हजार ९०२ मतदारांपैकी ९ लाख ६६ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे अंतिम आकडेवारीनंतर स्पष्ट झाले. यापूर्वी २०१२ च्या निवडणुकी इतकी ही मतांची टक्केवारी आहे.यापूर्वी ७ नोव्हेंबर २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत १३ लाख ३२ हजार १९८ मतदारांपैकी आठ लाख ६६ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये तीन लाख ९४ हजार ७८९ पुरुष व चार लाख ७१ हजार ७३४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही ६५.०४ टक्केवारी होती. यावेळेस ५८ हजार ७०४ मतदार वाढले व चार नगरपंचायतींचे किमान ४० हजार मतदान कमी झाले, असे एकूण १३ लाख ९० हजार ९०२ मतदार होते. यापैकी चार लाख ८९ हजार २८८ पुरुष व चार लाख १७ हजार २५० स्त्री असे एकूण नऊ लाख सहा हजार ५४१ स्त्री मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत दोन लाख ३६ हजार पुरुष व दोन लाख ४८ हजार २ असे एकूण चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. सकाळच्या पहिल्या दोन तासात केवळ ८७ हजार ९८७ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर मात्र मतदानाचा टक्का थोडा वाढला. दुपारी दीड पर्यंत चार लाख ६७ हजार ८३७ व साडेतीन पर्यंत सहा लाख ७० हजार १६३ व अंतिम क्षणापर्यंत म्हणजेच सायंकाळी साडेपाच पर्यंत एकूण नऊ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदान केले.दोन लाख ३६ हजार पुरुष मतदारांचा अनुत्साहजिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का अधिक आहे. या निवडणुकीत ७ लाख २५ हजार ६३० पुरुष मतदार होते. यापैकी ४ लाख ८९ हजार २८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर २ लाख ३६ हजार ३४२ मतदारांनी मतदान करणे टाळले. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने मतदानाचा टक्का यापूर्वीच निवडणुकीपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा होती. कमी मतदानाचा कुणाला धक्का बसणार, हे गुरूवारी स्पष्ट होईल.अडीच लाख स्त्री मतदारांनी टाळले मतदानया निवडणुकीत दोन लाख ३६ हजार ३४२ पुरुषांनी मतदान करणे टाळले. त्या तुलनेत स्त्री मतदार अधिक माघारले आहे. यावेळी चार लाख १७ हजार २५० स्त्री मतदारांपैकी दोन लाख ४८ हजार २ स्त्री मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविली आहे. दिवसाचा पारा ३९ अंशावर, प्रचाराला केवळ ६ दिवसाचा अवधी व तूर, हरभऱ्याचा हंगामामुळे ग्रामीण भागात स्त्री मतदारांनी अनुत्साह दाखविल्याचे दिसून येते. महिलांचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाद्वारा अधिक जनजागृतीची गरज आहे.चार नगरपंचायतींचे ४० हजार मतदार कमीजिल्ह्यात मागील वर्षी तिवसा, धारणी, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी नगरपंचायती स्थापित झाल्या व हे क्षेत्र नागरी झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वगळण्यात आले. त्यामुळे या वेळेच्या निवडणुकीत किमान ४० हजार मतदार कमी झाले. जिल्ह्यात पाच वर्षात ५८ हजार युवा मतदार वाढले असले तरी ४० हजार मतदान कमी झाल्याने अपेक्षित मतदान टक्केवारीचा टक्का माघारला. यंदाही भातकुली तालुका टक्केवारीत माघारलायंदाच्या निवडणुकीत चांदूरबाजार तालुक्यात ६८.०९ टक्के मतदान झाले. टक्केवारी हा तालुका अव्वल आहे. मात्र भातकुली तालुका शेवटच्यास्थानी राहीला. या तालुक्यात फक्त ५८.४९ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत देखील हा तालुका शेवटच्या स्थानी होता. त्यावेळी ५९.०८ टक्के मतदान झाले होते.