शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बागापूर परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:26 IST

तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या कॅमेरात कैद : शेळी केली फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या बिबटाने तीन दिवसांपूर्वी बागापूर येथील शेतकरी मनोहर पांडुरंग कोकर्डे यांची शेळी फस्त केली. यानंतर वनविभागातर्फे या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेरात एक बिबट कैद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली. हा बिबट्या पुढे जळका (जगताप), सालोरापर्यंत गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी जळका (जगताप) मध्ये बिबट असल्याची चर्चा सुरू होती. परंतु बागापूर परिसरात दिसलेला बिबट तोच आहे की अन्य, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान शेतामध्ये जाणाºया शेतकरी - शेतमजुरांनी सतर्क राहावे, शेतामध्ये कुणीही विद्युत प्रवाह सोडू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.वीजप्रवाह सोडू नये, ग्रामस्थांना पत्रशेतामध्ये कोणीही विद्युतप्रवाह सोडू नये, याबाबत संबंधित ग्रामपंचायतला वनविभागातर्फे पत्र देण्यात आले आहे. तसेच शेळीचे नुकसान झालेल्या व्यक्तीला लवकरच वनविभागातर्फे मदत मिळेल. नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन चांदूर रेल्वे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केले. चांदूर रेल्वे व वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यासह पाण्याची कमतरता भासत असल्याने बिबटांसह तृणभक्षी वन्यप्राणी बागायती शेती वा शहरालगतच्या परिसरात कूच करीत आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे वनविभागाने कळविले आहे.