शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

बागापूर परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:26 IST

तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या कॅमेरात कैद : शेळी केली फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या बिबटाने तीन दिवसांपूर्वी बागापूर येथील शेतकरी मनोहर पांडुरंग कोकर्डे यांची शेळी फस्त केली. यानंतर वनविभागातर्फे या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेरात एक बिबट कैद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली. हा बिबट्या पुढे जळका (जगताप), सालोरापर्यंत गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी जळका (जगताप) मध्ये बिबट असल्याची चर्चा सुरू होती. परंतु बागापूर परिसरात दिसलेला बिबट तोच आहे की अन्य, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान शेतामध्ये जाणाºया शेतकरी - शेतमजुरांनी सतर्क राहावे, शेतामध्ये कुणीही विद्युत प्रवाह सोडू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.वीजप्रवाह सोडू नये, ग्रामस्थांना पत्रशेतामध्ये कोणीही विद्युतप्रवाह सोडू नये, याबाबत संबंधित ग्रामपंचायतला वनविभागातर्फे पत्र देण्यात आले आहे. तसेच शेळीचे नुकसान झालेल्या व्यक्तीला लवकरच वनविभागातर्फे मदत मिळेल. नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन चांदूर रेल्वे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केले. चांदूर रेल्वे व वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यासह पाण्याची कमतरता भासत असल्याने बिबटांसह तृणभक्षी वन्यप्राणी बागायती शेती वा शहरालगतच्या परिसरात कूच करीत आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे वनविभागाने कळविले आहे.