शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रानभाज्यांना स्वतंत्र बाजारपेठ मिळणार : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. हा अमूल्य ठेवा आदिवासींनी जोपासल्याबाबत त्यांनी कौतुक केले. कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ठळक मुद्देप्रदर्शनीत ७० भाज्या : शिवाजी उद्यान महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपणूक व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला नावीन्यपूर्ण योजनेतून येत्या काळात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले.कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित रानभाज्या महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.७० प्रकारच्या रानभाज्यांचे 'स्टॉल'शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. हा अमूल्य ठेवा आदिवासींनी जोपासल्याबाबत त्यांनी कौतुक केले. कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीYashomati Thakurयशोमती ठाकूर