शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:01 IST

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविजेची प्रतिमाह १३०० कि.वॅटची बचत : देयकातही ४० लाखांनी कपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.महापालिका क्षेत्रात एनर्जी एफिशिएंशी सर्विसेससोबत एलईडी लावण्यासाठीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकाश विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सद्यस्थितीत ३६ हजार ६६० एलइडी पथदिवे लावले आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणासोबत जुने परंपरागत अधिक क्षमतेच्या एलईडी दिव्यांनी बदलून अधिभार तसेच देयकाची रक्कम कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी महापालिकेचा ‘इइएसएल’ या कंपनीसोबत २५.७७ कोटींचा पीपीपी तत्वावर करारदेखील झाला आहे. आता या कराराची मुदत संपल्याने देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या शिरावर आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आऊट स्कर्ट एरियातील पथदिव्यांच्या अडचणी कायम असल्याविषयीचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रशांत डवरे यांनी सभागृहात मांडून प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने विकसित होणाºया भागात पथदिवे लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. १, २ दिवे असल्यास नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून लावता येतील परिसरात एलईडी लावणे या निधीतून शक्य होणार नसल्याने यासंदर्भात नवीन धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक टिकाणी पथदिवे लटकत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील त्यांनी प्रशासनास विचारला आहे. त्यामुळे सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. महापालिकेची वीज वापरात जवळपास प्रतिमाह ४० लाखांनी बचत होत असल्याने शहरातील पथदिव्याच्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.अशी झाली वीजभार, देयकात बचतजुन्या परंपरागत दिव्यांचा वीज अधिभार जवळपास ३५३७ किलोवॅट होता. यामध्ये १०० ते २०० वॅटपर्यंतची ट्युबलाईट, सोडीयम व्हेपर व मरक्युरी लाइट होते. आता एलइडी लावल्याने २२०० किलोवॅटपर्यंत याचा वीज अधिभार आहे. महापालिकेद्वारे सरासरी ११ तास पथदिवे सुरू राहतात. यापूर्वी महापालिकेला एक कोटी १५ लाखांपर्यंत वीज देयके यायचे. आता विजेची बचत होत असल्याने ७५ ते ८० लाखांपर्यंत वीज देयके येत आहेत. यामध्ये साधारणपणे ४० लाखांपर्यंतची बचत होत असल्याची माहिती प्रकाश विभागाने दिली.असे लागले शहरात एलईडीकरारनुसार १८१ एलईडी लावण्यात आले. तर ५८३ जुने पथदिवे बदलण्यात आले. हायमास्टवर १५२८ फ्लडलाईट्स बदलविले. डमी पोलवर ५१९ एलईडी लावण्यात आले. उड्डाणपुलाखाली साधारणपणे २०० फ्लड लाईट्स लावले आहे. वाढीव पथदिव्यांची समख्या ३०११ आहे. एमओयूपूर्वी ही संख्या ३३ हजार ९१७ होती. एलइडी दिव्यांची सुधारित संख्या ३६ हजार ३४८ असल्याचे सांगण्यात आले.