शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:01 IST

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविजेची प्रतिमाह १३०० कि.वॅटची बचत : देयकातही ४० लाखांनी कपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.महापालिका क्षेत्रात एनर्जी एफिशिएंशी सर्विसेससोबत एलईडी लावण्यासाठीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकाश विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सद्यस्थितीत ३६ हजार ६६० एलइडी पथदिवे लावले आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणासोबत जुने परंपरागत अधिक क्षमतेच्या एलईडी दिव्यांनी बदलून अधिभार तसेच देयकाची रक्कम कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी महापालिकेचा ‘इइएसएल’ या कंपनीसोबत २५.७७ कोटींचा पीपीपी तत्वावर करारदेखील झाला आहे. आता या कराराची मुदत संपल्याने देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या शिरावर आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आऊट स्कर्ट एरियातील पथदिव्यांच्या अडचणी कायम असल्याविषयीचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रशांत डवरे यांनी सभागृहात मांडून प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने विकसित होणाºया भागात पथदिवे लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. १, २ दिवे असल्यास नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून लावता येतील परिसरात एलईडी लावणे या निधीतून शक्य होणार नसल्याने यासंदर्भात नवीन धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक टिकाणी पथदिवे लटकत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील त्यांनी प्रशासनास विचारला आहे. त्यामुळे सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. महापालिकेची वीज वापरात जवळपास प्रतिमाह ४० लाखांनी बचत होत असल्याने शहरातील पथदिव्याच्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.अशी झाली वीजभार, देयकात बचतजुन्या परंपरागत दिव्यांचा वीज अधिभार जवळपास ३५३७ किलोवॅट होता. यामध्ये १०० ते २०० वॅटपर्यंतची ट्युबलाईट, सोडीयम व्हेपर व मरक्युरी लाइट होते. आता एलइडी लावल्याने २२०० किलोवॅटपर्यंत याचा वीज अधिभार आहे. महापालिकेद्वारे सरासरी ११ तास पथदिवे सुरू राहतात. यापूर्वी महापालिकेला एक कोटी १५ लाखांपर्यंत वीज देयके यायचे. आता विजेची बचत होत असल्याने ७५ ते ८० लाखांपर्यंत वीज देयके येत आहेत. यामध्ये साधारणपणे ४० लाखांपर्यंतची बचत होत असल्याची माहिती प्रकाश विभागाने दिली.असे लागले शहरात एलईडीकरारनुसार १८१ एलईडी लावण्यात आले. तर ५८३ जुने पथदिवे बदलण्यात आले. हायमास्टवर १५२८ फ्लडलाईट्स बदलविले. डमी पोलवर ५१९ एलईडी लावण्यात आले. उड्डाणपुलाखाली साधारणपणे २०० फ्लड लाईट्स लावले आहे. वाढीव पथदिव्यांची समख्या ३०११ आहे. एमओयूपूर्वी ही संख्या ३३ हजार ९१७ होती. एलइडी दिव्यांची सुधारित संख्या ३६ हजार ३४८ असल्याचे सांगण्यात आले.