शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:01 IST

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविजेची प्रतिमाह १३०० कि.वॅटची बचत : देयकातही ४० लाखांनी कपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.महापालिका क्षेत्रात एनर्जी एफिशिएंशी सर्विसेससोबत एलईडी लावण्यासाठीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकाश विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सद्यस्थितीत ३६ हजार ६६० एलइडी पथदिवे लावले आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणासोबत जुने परंपरागत अधिक क्षमतेच्या एलईडी दिव्यांनी बदलून अधिभार तसेच देयकाची रक्कम कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी महापालिकेचा ‘इइएसएल’ या कंपनीसोबत २५.७७ कोटींचा पीपीपी तत्वावर करारदेखील झाला आहे. आता या कराराची मुदत संपल्याने देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या शिरावर आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आऊट स्कर्ट एरियातील पथदिव्यांच्या अडचणी कायम असल्याविषयीचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रशांत डवरे यांनी सभागृहात मांडून प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने विकसित होणाºया भागात पथदिवे लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. १, २ दिवे असल्यास नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून लावता येतील परिसरात एलईडी लावणे या निधीतून शक्य होणार नसल्याने यासंदर्भात नवीन धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक टिकाणी पथदिवे लटकत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील त्यांनी प्रशासनास विचारला आहे. त्यामुळे सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. महापालिकेची वीज वापरात जवळपास प्रतिमाह ४० लाखांनी बचत होत असल्याने शहरातील पथदिव्याच्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.अशी झाली वीजभार, देयकात बचतजुन्या परंपरागत दिव्यांचा वीज अधिभार जवळपास ३५३७ किलोवॅट होता. यामध्ये १०० ते २०० वॅटपर्यंतची ट्युबलाईट, सोडीयम व्हेपर व मरक्युरी लाइट होते. आता एलइडी लावल्याने २२०० किलोवॅटपर्यंत याचा वीज अधिभार आहे. महापालिकेद्वारे सरासरी ११ तास पथदिवे सुरू राहतात. यापूर्वी महापालिकेला एक कोटी १५ लाखांपर्यंत वीज देयके यायचे. आता विजेची बचत होत असल्याने ७५ ते ८० लाखांपर्यंत वीज देयके येत आहेत. यामध्ये साधारणपणे ४० लाखांपर्यंतची बचत होत असल्याची माहिती प्रकाश विभागाने दिली.असे लागले शहरात एलईडीकरारनुसार १८१ एलईडी लावण्यात आले. तर ५८३ जुने पथदिवे बदलण्यात आले. हायमास्टवर १५२८ फ्लडलाईट्स बदलविले. डमी पोलवर ५१९ एलईडी लावण्यात आले. उड्डाणपुलाखाली साधारणपणे २०० फ्लड लाईट्स लावले आहे. वाढीव पथदिव्यांची समख्या ३०११ आहे. एमओयूपूर्वी ही संख्या ३३ हजार ९१७ होती. एलइडी दिव्यांची सुधारित संख्या ३६ हजार ३४८ असल्याचे सांगण्यात आले.