शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:01 IST

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविजेची प्रतिमाह १३०० कि.वॅटची बचत : देयकातही ४० लाखांनी कपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.महापालिका क्षेत्रात एनर्जी एफिशिएंशी सर्विसेससोबत एलईडी लावण्यासाठीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकाश विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सद्यस्थितीत ३६ हजार ६६० एलइडी पथदिवे लावले आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणासोबत जुने परंपरागत अधिक क्षमतेच्या एलईडी दिव्यांनी बदलून अधिभार तसेच देयकाची रक्कम कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी महापालिकेचा ‘इइएसएल’ या कंपनीसोबत २५.७७ कोटींचा पीपीपी तत्वावर करारदेखील झाला आहे. आता या कराराची मुदत संपल्याने देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या शिरावर आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आऊट स्कर्ट एरियातील पथदिव्यांच्या अडचणी कायम असल्याविषयीचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रशांत डवरे यांनी सभागृहात मांडून प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने विकसित होणाºया भागात पथदिवे लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. १, २ दिवे असल्यास नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून लावता येतील परिसरात एलईडी लावणे या निधीतून शक्य होणार नसल्याने यासंदर्भात नवीन धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक टिकाणी पथदिवे लटकत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील त्यांनी प्रशासनास विचारला आहे. त्यामुळे सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. महापालिकेची वीज वापरात जवळपास प्रतिमाह ४० लाखांनी बचत होत असल्याने शहरातील पथदिव्याच्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.अशी झाली वीजभार, देयकात बचतजुन्या परंपरागत दिव्यांचा वीज अधिभार जवळपास ३५३७ किलोवॅट होता. यामध्ये १०० ते २०० वॅटपर्यंतची ट्युबलाईट, सोडीयम व्हेपर व मरक्युरी लाइट होते. आता एलइडी लावल्याने २२०० किलोवॅटपर्यंत याचा वीज अधिभार आहे. महापालिकेद्वारे सरासरी ११ तास पथदिवे सुरू राहतात. यापूर्वी महापालिकेला एक कोटी १५ लाखांपर्यंत वीज देयके यायचे. आता विजेची बचत होत असल्याने ७५ ते ८० लाखांपर्यंत वीज देयके येत आहेत. यामध्ये साधारणपणे ४० लाखांपर्यंतची बचत होत असल्याची माहिती प्रकाश विभागाने दिली.असे लागले शहरात एलईडीकरारनुसार १८१ एलईडी लावण्यात आले. तर ५८३ जुने पथदिवे बदलण्यात आले. हायमास्टवर १५२८ फ्लडलाईट्स बदलविले. डमी पोलवर ५१९ एलईडी लावण्यात आले. उड्डाणपुलाखाली साधारणपणे २०० फ्लड लाईट्स लावले आहे. वाढीव पथदिव्यांची समख्या ३०११ आहे. एमओयूपूर्वी ही संख्या ३३ हजार ९१७ होती. एलइडी दिव्यांची सुधारित संख्या ३६ हजार ३४८ असल्याचे सांगण्यात आले.