शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमंत्रालयासाठी आज सोडत

By admin | Updated: October 5, 2016 00:15 IST

फेब्रुवारी-मार्च २०१७ महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी...

राजकीय वर्तुळाचे लक्ष : झेडपी, पंसच्या गट-गणांच्या आरक्षणाची घोषणा अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०१७ महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत बुधवार ५ आॅक्टोेबर रोजी काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या बचत भवनात तर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढली जाईल. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणक्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती, महिलांसाठी आरक्षित जागा व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (महिला आरक्षणासह) राखून ठेवायच्या जागा आणि उर्वरित सर्वसाधारण संवर्गातील महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण या सोडतीमध्ये निश्चित केले जाणार आहे. जि.प.मध्ये वर्षानुवर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे फेरबदलासाठी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. आघाडीला वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कस लावावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने कोणाचीही सत्ता आली तरी अध्यक्षपदी अनुसूचित जातीचा उमेदवार आरूढ होईल. जागा अशा राहणार राखीव झेडपीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी १२, अनुसूचित जातींसाठी ११ अशा २३ जागा राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातींमध्ये प्रत्येकी ५ खुला प्रवर्ग आणि महिला तर अनुसूचित जमातींमध्ये प्रत्येकी ६ याप्रमाणे खुला प्रवर्ग आणि महिलांना संधी मिळणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण १६ जागा राखीव असून यात प्रत्येकी ८ जागा पुरूष-महिलांसाठी राखिव असतील, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० जागा राहणार असून प्रत्येकी दहा याप्रमाणे महिला आणि पुरूषांकरीता जागा राहणार आहेत. नेत्यांची राहणार मांदियाळीजिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी बचतभवनात तर पंचायत समितीकरिता तहसील कार्यालयात सोडत काढली जाणार असल्याने इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. उत्सुकता शिगेला जि.प.,पं.सच्या गट व गणांच्या आरक्षण सोडतीचीसर्व राजकीय पक्षांना प्रतीक्षा लागली होती. अखेर त्यासाठी मुहूर्त जवळ आला आहे. त्यामुळे बुधवारी आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.