शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न सोडाच; उत्पादन खर्चाचेही वावडे!

By admin | Updated: December 11, 2014 23:00 IST

मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे.

अमरावती : मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे. प्रमुख पिकांच्या लागवडीसह फवारणी व काढणीपर्यंतचा अर्धा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र यावर्षी पहायला मिळत आहे. मागील दशकापासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. विशेषत: रोखीचे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले. खरिपाच्या सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा ५० टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी लागवडक्षेत्र ७ लाख १४ हजार हेक्टर असताना ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे; तथापि पेरणीनंतर जून महिन्यापासून दीड महिना पावसाची दडी, त्यानंतर पावसात खंड व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. मागील दोन, तीन वर्षांचा सोयाबीन पिकाचा ताळेबंद पाहिला असता उत्पादन खर्चाच्या अर्धेदेखील उत्पन्न झालेले नाही.बँकांचे पीककर्ज, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली होती. पेरणी पाठोपाठ डीएपी खते, तणनाशके, कीटकनाशकांच्या तीन फवारण्या, निंदण, खुरपण, मशागत ते काढणीपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांनी केला. प्रतिएकर खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचा उतारा व प्रतीक्विंटल मिळणाऱ्या भावाचा ताळेबंद पाहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला निम्मे खर्चही पदरात पडला नाही. आणेवारीदेखील ४६ पैसेच आहे. म्हणजेच जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.