शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शिका, पण आता समजदारीनेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा ...

बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना

अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारा काळ रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणाचाच असेल. विद्यार्थ्यांंना समाजाधारित शिक्षण देण्यावर व त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक घडविण्याचे ठोस काम आता होईल. पण, पालकांनो आता पाल्यांना शिकवा समजदारीनेच, अशा सूचना वजा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आभासी पद्धतीने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ना. कडू बोलत होते. आपल्या शिक्षणात शेती, उद्योग व व्यवसायाला स्थानच नाही. त्यामुळे या तीन बाबींचादेखील शिक्षणात समावेश व्हावा. त्यासोबतच विद्यार्थी शिकत असताना त्यांच्यातील त्या व्यवसायनुरूप बाबींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवून त्या विद्यार्थ्यांंना त्या पद्धतीने घडविण्यावर भर द्यावा लागेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगीसुद्धा गुणवत्ता असते. पण पारंपरिक शिक्षणाने ती समोर येत नाही. मात्र, आता राज्याचा शालेय शिक्षण विभाग याबाबत सकारात्मकच कृती करणार असल्याचा विश्वास व ग्वाही बच्चू कडू यांनी दिली. तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत अमरावती विभागातील विविध क्षेत्रात नैपुण्यप्राप्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यांचे सहा गट तयार करण्यात आले असून, विविध बारकाव्यांवर अभ्यास व निरीक्षण ते नोंदवून एक ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, स्वीय सहायक राहुल मोहोड, अधिव्याख्याता प्रशांत डवरे यांच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक उपस्थित होते.