शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शिका, पण आता समजदारीनेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा ...

बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना

अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारा काळ रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणाचाच असेल. विद्यार्थ्यांंना समाजाधारित शिक्षण देण्यावर व त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक घडविण्याचे ठोस काम आता होईल. पण, पालकांनो आता पाल्यांना शिकवा समजदारीनेच, अशा सूचना वजा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आभासी पद्धतीने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ना. कडू बोलत होते. आपल्या शिक्षणात शेती, उद्योग व व्यवसायाला स्थानच नाही. त्यामुळे या तीन बाबींचादेखील शिक्षणात समावेश व्हावा. त्यासोबतच विद्यार्थी शिकत असताना त्यांच्यातील त्या व्यवसायनुरूप बाबींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवून त्या विद्यार्थ्यांंना त्या पद्धतीने घडविण्यावर भर द्यावा लागेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगीसुद्धा गुणवत्ता असते. पण पारंपरिक शिक्षणाने ती समोर येत नाही. मात्र, आता राज्याचा शालेय शिक्षण विभाग याबाबत सकारात्मकच कृती करणार असल्याचा विश्वास व ग्वाही बच्चू कडू यांनी दिली. तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत अमरावती विभागातील विविध क्षेत्रात नैपुण्यप्राप्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यांचे सहा गट तयार करण्यात आले असून, विविध बारकाव्यांवर अभ्यास व निरीक्षण ते नोंदवून एक ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, स्वीय सहायक राहुल मोहोड, अधिव्याख्याता प्रशांत डवरे यांच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक उपस्थित होते.