शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंची परीक्षा विभागाला भेट : केंद्रीय मूल्यांकन विभागाच्या माळ्यावर फेकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेच्या उत्तरपत्रिका दोन दिवसांपूर्वी कचºयात आढळल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. दरम्यान, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी सुटीच्या दिवशी परीक्षा विभागात भेट दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे. ‘मास्किंग डी मॉस्किंग’ असे उत्तरपत्रिकांची प्रक्रिया चालत असून, याद्वारे उत्तरपत्रिका कचºयात फेकल्या असाव्यात, असा दाट संशय परीक्षा विभागाला आहे. मात्र, परीक्षा विभागातील प्रत्येक कर्मचाºयावर तिसरा डोळा असतो. काहीही गैर होऊ नये, अशी व्यवस्था विद्यापीठाने परीक्षा विभागात केली आहे.उत्तरपत्रिका कचºयात आढळल्याप्रकरणी चौकशी प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. सहा महिन्यांपर्यंत उत्तरपत्रिकांची सुरक्षा आणि जतन करण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांवर सोपविली आहे. कचºयातील उत्तरपत्रिकाप्रकरणी पुनर्मूल्यांकनाचे धागेदोरे असल्याची चर्चा रंगली आहे.पुनर्मूल्यांकनात गुणवाढीचा सपाटाउन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात गुणवाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यापूर्वी मूल्यांकन करणाºया प्राध्यापकांवर संशयाची सुई आहे. काही विद्यार्थ्यांना एक-दोन नव्हे, चक्क पुनर्मूल्यांकनात ३० ते ४० गुणांची वाढ मिळाल्याची माहिती आहे. गुणवाढीचे संशोधन केल्यास ‘फिक्ंिसग’मध्ये कोण हे उघडकीस येईल, असे सूत्रांनी सांगितले.बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या दोन उत्तरपत्रिका कचऱ्यात आढळल्या आहेत. मूल्यांकनादरम्यान काही उत्तरपत्रिका गहाळ होत्या. ही बाब फार गंभीर नाही. तरीही याप्रकरणी दक्षता घेण्यात येत आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ