फोटो पी १८ धामणगाव
सात ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती :
तीन गावांमध्ये ईश्वरचिठ्ठी
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीत काँग्रेस व भाजप प्रणीत पॅनेलने विजय प्राप्त केला आहे. पैकी ३२ ग्रामपंचायतींवर काँग्रेसप्रणीत उमेदवार निवडून आल्याचा दावा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला. जुना धामणगाव, जळगाव आर्वी, आजणगाव, देवगाव, रायपूर, सोनेगाव खर्डा, दिघी महल्ले, सावळा, उसळगव्हाण, तिवरा, ढाकूलगाव, पिंपळखुटा, वसाड, कावली, बोरवघड, शिंदोडी ग्रामपंचायतींमध्ये भाजपने वर्चस्व निर्माण केल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. तालुक्यातील शेंदूरजना खुर्द, हिरपूर, निंभोरा राज, नायगाव, वाढोणा, विरुळ रोंघे, बोरगाव धांदे, वाघोली, झाडा, तरोडा, अंजनसिंगी, वरूड बगाजी, पेठ रघुनाथपूर, गव्हा फरकाडे, गव्हा निपाणी, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली आसेगाव, निंबोली, विटाळा वकनाथ, बोरगाव निस्ताने, दाभाडा, काशीखेड, निंभोरा बोडखा, चिंचोली, कळाशी, आसेगाव, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, भातकुली रेणुकापूर या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेससमर्थित उमेदवार विजयी झाले. हिंगणगाव, जळगाव, मंगरूळ तळणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अशोकनगर येथे शिवसेनेचे मनोज कडू यांचे पॅनल विजयी झाले.
जुना धामणगाव येथे पूजा आरेकर, दाभाडा येथे स्नेहल प्रमोद राऊत, तर मंगरूळ दस्तगीर येथे विठ्ठल चव्हाण ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले.