शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

एलबीटी वसुलीला वेग येणार

By admin | Updated: April 23, 2015 00:01 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी पुढील आठवड्यात जोरदार कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.....

नोटीस बजावली : आयुक्तांच्या बैठकीनंतर ठरेल कारवाईची दिशाअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी पुढील आठवड्यात जोरदार कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. एलबीटी दर फरकाची रक्कम भरण्यात यावी, याकरिता व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कर भरण्याचा अवधी आठ दिवसाचा असून त्यानंतर ठोस कारवाई केली जाणार आहे.कापड, साखर, तेल, कच्च्या मालाची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना २१ महिन्यांच्या एलबीटी फरकाची रक्कम भरण्याच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीशींनी व्यावसायिक हतबल झाले आहेत. दुसरीकडे राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार एलबीटी वसुलीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही, हे वास्तव आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांसाठी अभयदान योजना लागू करण्याची घोषणा केली. या योजनेत एलबीटी सक्तीने वसूल करता येणार नाही. तसेच दंडात्मक किंवा प्रतिष्ठानांना टाळे, बँक खाती सील करता येणार नाही, हे अपेक्षित आहे. मात्र शासनाने केवळ घोषणा केली. निर्णयाचे आदेशपत्र प्राप्त झाले नसल्याने प्रशासनाला एलबीटी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र आहे. यात केवळ व्यापारी संभ्रमावस्थेत असून एलबीटी भरला नाही तर महापालिका कारवाई करते. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी एलबीटीवरुन हात वर केल्याचे चित्र आहे. १ जुलै २०१२ ते १ एप्रिल २०१४ या दरम्यान एलबीटी फरकाची रक्कम वसूल करण्याची आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कृतिआराखडा तयार केला आहे. प्रारंभी ज्या व्यापाऱ्यांनी कराचा भरणा केला नाही त्यांना नोटीस देऊन अवगत केले जात आहे. निर्धारित कालावधीत एलबीटी भरला गेला नाही तर ती रक्कम कोणत्या नियमानुसार वसूल करावी, याचे नियोजनदेखील प्रशासनाने केले आहे. त्याकरीता केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. काही प्रतिष्ठांनानी विवरणपत्र सादर केले नसल्याने अशाविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे. एलबीटी विभागाला केवळ आयुक्त सुटीवरुन परत येण्याची प्रतीक्षा आहे. एलबीटी फरकाची रक्कम भरण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यामुळे व्यावसायीक संघटना आमदार, खासदारांच्या पायऱ्या झिजवीत असल्याचे दिसून येते. एलबीटी कराची रक्कम वसूल करण्यासाठी सुमारे पाचशे व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.