शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

नव्या रुपात एलबीटी कायम?

By admin | Updated: March 10, 2015 00:32 IST

राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी)

३० मार्चपर्यंत वसुलीचे निर्देश : ५० कोटींच्या उलाढालीवर करअमरावती : राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी) करु, अशी घोषणा निवडणुकीच्या काळात केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ एप्रिलपासून एलबीटी संपणार, असे जाहीर केले आहे. मात्र, तूर्तास एलबीटी हटविणे शक्य नसल्याने हा कर काही काळ कायम ठेवून पुन्हा नव्या रुपात आणण्याची तयारी शासनकर्त्यांनी केली आहे.ज्या व्यापारी प्रतिष्ठानांची उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांकडून एलबीटी वसूल करण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयात हालचालींना वेग आला आहे.एलबीटीऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू करण्याची रणनीती भाजपचे नेते आखत आहेत. मात्र, राज्यातून एलबीटी हटविल्यास महापालिकांना अनुदान कसे देणार? हा प्रश्न शासनकर्त्यांना सतावतो आहे. त्यामुळे जीएसटी ही कर प्रणाली लागू होईपर्यंत एलबीटी कायम ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांकडून एलबीटी वसूल करण्याची शक्कल लढविली जात आहे. त्याअनुषंगाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थखात्याने नव्या रुपात एलबीटी कर सुरु ठेवण्याची तयारी चालविली आहे. जीएसटी प्रणालीचा प्रारुप आराखडा तयार होईपर्यंत व्यापाऱ्यांनी एलबीटी भरुन स्थानिक स्वराज्य संस्थाना सहकार्य करण्याचे आवाहन अर्थमंत्री स्वत: करणार असल्याची माहिती आहे. राज्यातील ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांची यादी अर्थखात्याने मागविली आहे. अमरावतीत केवळ चार व्यावसायिकांची उलाढाल ५० कोटींच्यावर असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते. अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली निश्चित होईल. शासनाच्या निर्णयानुसार कर प्रणाली लागू करु. एलबीटीबाबत काहीही माहिती नाही. -अरुण डोंगरे,आयुक्त, महापालिका.