शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रुपात एलबीटी कायम?

By admin | Updated: March 10, 2015 00:32 IST

राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी)

३० मार्चपर्यंत वसुलीचे निर्देश : ५० कोटींच्या उलाढालीवर करअमरावती : राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी) करु, अशी घोषणा निवडणुकीच्या काळात केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ एप्रिलपासून एलबीटी संपणार, असे जाहीर केले आहे. मात्र, तूर्तास एलबीटी हटविणे शक्य नसल्याने हा कर काही काळ कायम ठेवून पुन्हा नव्या रुपात आणण्याची तयारी शासनकर्त्यांनी केली आहे.ज्या व्यापारी प्रतिष्ठानांची उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांकडून एलबीटी वसूल करण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयात हालचालींना वेग आला आहे.एलबीटीऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू करण्याची रणनीती भाजपचे नेते आखत आहेत. मात्र, राज्यातून एलबीटी हटविल्यास महापालिकांना अनुदान कसे देणार? हा प्रश्न शासनकर्त्यांना सतावतो आहे. त्यामुळे जीएसटी ही कर प्रणाली लागू होईपर्यंत एलबीटी कायम ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांकडून एलबीटी वसूल करण्याची शक्कल लढविली जात आहे. त्याअनुषंगाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थखात्याने नव्या रुपात एलबीटी कर सुरु ठेवण्याची तयारी चालविली आहे. जीएसटी प्रणालीचा प्रारुप आराखडा तयार होईपर्यंत व्यापाऱ्यांनी एलबीटी भरुन स्थानिक स्वराज्य संस्थाना सहकार्य करण्याचे आवाहन अर्थमंत्री स्वत: करणार असल्याची माहिती आहे. राज्यातील ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांची यादी अर्थखात्याने मागविली आहे. अमरावतीत केवळ चार व्यावसायिकांची उलाढाल ५० कोटींच्यावर असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते. अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली निश्चित होईल. शासनाच्या निर्णयानुसार कर प्रणाली लागू करु. एलबीटीबाबत काहीही माहिती नाही. -अरुण डोंगरे,आयुक्त, महापालिका.