शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१ आॅगस्टपासून एलबीटी होणार हद्दपार

By admin | Updated: July 25, 2015 00:05 IST

राज्य शासनाच्या घोषणेनुसार १ आॅगस्टपासून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) महापालिकांमधून हद्दपार होणार आहे.

अधिसूचना जारी : ५० कोटींपेक्षा अधिक उलाढालीवर कायमअमरावती : राज्य शासनाच्या घोषणेनुसार १ आॅगस्टपासून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) महापालिकांमधून हद्दपार होणार आहे. त्यानुषंगाने शासनाने अधिसूचना जारी केली आहे. ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एलबीटीच वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी महापालिकेला आर्थिक चिंता सतावते आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव गो.आ. लोखंडे यांच्या स्वाक्षरीने गुरुवार २३ जुलै रोजी अधिसचूना जारी करुन राज्यातून एलबीटी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलै २०१२ पासून सुरु झालेला एलबीटी कर ३१ जुलै २०१५ रोजी महापालिकांमधून संपुष्टात येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने अन्यायकारक एलबीटीतून व्यापाऱ्यांना मुक्ती मिळवून देण्याची घोषणा केली होती.अमरावती : एलबीटी हटणार किंवा नाही? याबाबत व्यापारी संभ्रमात होते. याच काळात एलबीटीला पर्याय म्हणून नवी कर प्रणाली कोणती लागू करावी, याविषयी शासन स्तरावर मंथनदेखील झाले. एलबीटी बंद केल्यानंतर महापालिका उत्पन्नाचे साधन कोणते? एलबीटी तुटीची रक्कम कोठून अदा करावी, अशा विविध मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा करून मागील अर्थसंकल्पात एलबीटीची तूट भरुन काढण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने करुन ठेवली होती. राज्यातील महापालिकांचा विचार केला तर हे ३ हजार कोटी रुपये तोकडे आहेत. तथापि शासनाने एलबीटी हद्दपार करणार ही निवडणूक काळात केलेल्या घोषणेची पुर्तता होण्यास केवळ आठ दिवसांचा कालावधी असताना शुक्रवारी शासनाने अधिसूचना काढून या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. परंतु नियम १७ मध्ये उपनियम (१) मध्ये खंड (ख) नुसार ज्या व्यापाऱ्यांच्या खरेदी किंवा विक्रीची उलाढाल १ एप्रिल २०१५ रोजी सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वीच म्हणजेच १ एप्रिलपूर्वी ५० कोटी रुपयांपेक्षा कमी असेल असे व्यापारी एलबीटी नोंदणी करु शकतात. तसेच आयुक्त अथवा एलबीटी विभागाला वाटेल त्यानुसार सविस्तर तपासणी करुन नोंदणी रद्द करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. अधिसूचनेच्या अनुषंगाने कार्यवाही करुन तसा अहवाल शासनाला कळविण्याचे कक्ष अधिकारी सु.उ. राठोड यांचे निर्देश आहेत. एलबीटी बंदच्या निर्णयामुळे अमरावती महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांच्या हितासोबतच शासन तिजोरीवर भार पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे. राज्य शासन लोकाभिमुख असल्याचे सिद्ध झाले आहे.- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती.५० कोटींपेक्षा अधिक उलाढालीवर एलबीटी कायम ठेवून इतरांना त्यातून मुक्ती मिळाली आहे. या निर्णयाचा ‘ड’ वर्ग महापालिकांना न्याय मिळेल. मध्यममार्ग शोधून शासनाने व्यापाऱ्यांना दिलासा दिला.- सुनील देशमुख, आमदार, अमरावती.एलबीटी रद्द करताना व्यापाऱ्यांची केलेली विभागणी अन्यायकारक आहे. त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष मोहन गुरनानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एलबीटी संपूर्णत: रद्द करण्याची मागणी करतील.- सुरेश जैन, अध्यक्ष, चेंबर्स आॅफ कॉमर्स.