शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या कायद्याने सिंचन विहिरींना अडसर

By admin | Updated: February 13, 2015 00:51 IST

सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या.

परतवाडा : सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या. मात्र वन विभागाचे जाचक कायदे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे स्फोटाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या संपूर्ण विहिरी आज धूळ खात पडल्या आहेत.मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एमआरजीएस या सिंचन योजनेंतर्गत धारणी तालुक्यात २९८ तर चिखलदरा तालुक्यात १५० विहिरी मंजूर झाल्यात. यातील एका विहिरीसाठी शासनाकडून प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जातात. परंतु वनविभागाने ५०० मीटरच्या आत असणाऱ्या विहिरींना स्फोट करण्याची परवानगी सपशेल नाकारली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहेत. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मेळघाटात शासनाच्या या लोकोपयोगी योजनेचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला असल्याचा गंभीर आरोप जि.प. सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांनी केला आहे. चिखलदरा तालुक्यातील खडीमल, ढोमणी फाटा, मोठा फाटा या गावात आज हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने या गावांना जि.प.ने टँकरमार्फत पाणीपुरवठा करणे सुरू केले आहे. हत्तीघाट, बुरडघाट, आवागढ व आदरी या गावांसाठी येत्या आठ दिवसांत स्वतंत्र टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे, त्या गावांना टँकरव्दारे पाणी पुरवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित तहसीलदारांना दिल्या आहेत. मात्र आदिवासी भागात पाण्याचे दुर्भीक्ष अधिक असताना धारणी व चिखलदऱ्याचे तहसीलदार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आदिवासी नागरिकांचा आरोप आहे. पाणीटंचाई अनेक प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळखात पडले असताना स्वच्छ पेयजल हे प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावे, म्हणून शासन यावर अवाढव्य खर्च करीत आहे. मात्र ते निव्वळ वाया जात आहे. अधिकाऱ्यांनाच्या नियोजनाअभावी सदर योजना फक्त कागदावरच आता पूर्ण होणार आहे. आगामी उन्हाळा बघता जिल्ह्यातील तीव्र पाणीर्टंचाईची समस्या बघून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील काही तालुक्यांत एकूण १९० कुपनलिकांना अंतिम मंजुरात दिली आहे. त्यात अचलपूर १५, अमरावती २०, नांदगाव खंडेश्वर ३२, धामणगाव रे. ३६, धारणी २५, चिखलदरा १५, चांदूरबाजार ७, भातकुली ४, तिवसा ७, चादूररेल्वे १ व दर्यापूर १ याप्रमाणे कुपनलिका मंजूर झाल्या आहेत. सदर तालुक्यातील गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत या कुपनलिका तयार केली जाणार आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याचे हे प्रशासनाचे सकारात्मक पाऊल असल्याचे गैलवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)