शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

वनविभागाच्या कायद्याने सिंचन विहिरींना अडसर

By admin | Updated: February 13, 2015 00:51 IST

सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या.

परतवाडा : सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या. मात्र वन विभागाचे जाचक कायदे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे स्फोटाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या संपूर्ण विहिरी आज धूळ खात पडल्या आहेत.मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एमआरजीएस या सिंचन योजनेंतर्गत धारणी तालुक्यात २९८ तर चिखलदरा तालुक्यात १५० विहिरी मंजूर झाल्यात. यातील एका विहिरीसाठी शासनाकडून प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जातात. परंतु वनविभागाने ५०० मीटरच्या आत असणाऱ्या विहिरींना स्फोट करण्याची परवानगी सपशेल नाकारली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहेत. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मेळघाटात शासनाच्या या लोकोपयोगी योजनेचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला असल्याचा गंभीर आरोप जि.प. सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांनी केला आहे. चिखलदरा तालुक्यातील खडीमल, ढोमणी फाटा, मोठा फाटा या गावात आज हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने या गावांना जि.प.ने टँकरमार्फत पाणीपुरवठा करणे सुरू केले आहे. हत्तीघाट, बुरडघाट, आवागढ व आदरी या गावांसाठी येत्या आठ दिवसांत स्वतंत्र टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे, त्या गावांना टँकरव्दारे पाणी पुरवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित तहसीलदारांना दिल्या आहेत. मात्र आदिवासी भागात पाण्याचे दुर्भीक्ष अधिक असताना धारणी व चिखलदऱ्याचे तहसीलदार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आदिवासी नागरिकांचा आरोप आहे. पाणीटंचाई अनेक प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळखात पडले असताना स्वच्छ पेयजल हे प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावे, म्हणून शासन यावर अवाढव्य खर्च करीत आहे. मात्र ते निव्वळ वाया जात आहे. अधिकाऱ्यांनाच्या नियोजनाअभावी सदर योजना फक्त कागदावरच आता पूर्ण होणार आहे. आगामी उन्हाळा बघता जिल्ह्यातील तीव्र पाणीर्टंचाईची समस्या बघून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील काही तालुक्यांत एकूण १९० कुपनलिकांना अंतिम मंजुरात दिली आहे. त्यात अचलपूर १५, अमरावती २०, नांदगाव खंडेश्वर ३२, धामणगाव रे. ३६, धारणी २५, चिखलदरा १५, चांदूरबाजार ७, भातकुली ४, तिवसा ७, चादूररेल्वे १ व दर्यापूर १ याप्रमाणे कुपनलिका मंजूर झाल्या आहेत. सदर तालुक्यातील गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत या कुपनलिका तयार केली जाणार आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याचे हे प्रशासनाचे सकारात्मक पाऊल असल्याचे गैलवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)