शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
3
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
4
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
5
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
6
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
7
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
8
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
9
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
10
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
11
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
12
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
13
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
14
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
15
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
16
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
17
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
18
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
19
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
20
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...

वनविभागाच्या कायद्याने सिंचन विहिरींना अडसर

By admin | Updated: February 13, 2015 00:51 IST

सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या.

परतवाडा : सातपुडा पर्वतराईच्या कुशीत निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शासनाने एकूण ४४८ सिंचन विहिरी मंजूर केल्या. मात्र वन विभागाचे जाचक कायदे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे स्फोटाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या संपूर्ण विहिरी आज धूळ खात पडल्या आहेत.मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एमआरजीएस या सिंचन योजनेंतर्गत धारणी तालुक्यात २९८ तर चिखलदरा तालुक्यात १५० विहिरी मंजूर झाल्यात. यातील एका विहिरीसाठी शासनाकडून प्रत्येकी तीन लाख रुपये दिले जातात. परंतु वनविभागाने ५०० मीटरच्या आत असणाऱ्या विहिरींना स्फोट करण्याची परवानगी सपशेल नाकारली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहेत. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मेळघाटात शासनाच्या या लोकोपयोगी योजनेचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला असल्याचा गंभीर आरोप जि.प. सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांनी केला आहे. चिखलदरा तालुक्यातील खडीमल, ढोमणी फाटा, मोठा फाटा या गावात आज हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने या गावांना जि.प.ने टँकरमार्फत पाणीपुरवठा करणे सुरू केले आहे. हत्तीघाट, बुरडघाट, आवागढ व आदरी या गावांसाठी येत्या आठ दिवसांत स्वतंत्र टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे, त्या गावांना टँकरव्दारे पाणी पुरवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित तहसीलदारांना दिल्या आहेत. मात्र आदिवासी भागात पाण्याचे दुर्भीक्ष अधिक असताना धारणी व चिखलदऱ्याचे तहसीलदार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आदिवासी नागरिकांचा आरोप आहे. पाणीटंचाई अनेक प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळखात पडले असताना स्वच्छ पेयजल हे प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावे, म्हणून शासन यावर अवाढव्य खर्च करीत आहे. मात्र ते निव्वळ वाया जात आहे. अधिकाऱ्यांनाच्या नियोजनाअभावी सदर योजना फक्त कागदावरच आता पूर्ण होणार आहे. आगामी उन्हाळा बघता जिल्ह्यातील तीव्र पाणीर्टंचाईची समस्या बघून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील काही तालुक्यांत एकूण १९० कुपनलिकांना अंतिम मंजुरात दिली आहे. त्यात अचलपूर १५, अमरावती २०, नांदगाव खंडेश्वर ३२, धामणगाव रे. ३६, धारणी २५, चिखलदरा १५, चांदूरबाजार ७, भातकुली ४, तिवसा ७, चादूररेल्वे १ व दर्यापूर १ याप्रमाणे कुपनलिका मंजूर झाल्या आहेत. सदर तालुक्यातील गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत या कुपनलिका तयार केली जाणार आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याचे हे प्रशासनाचे सकारात्मक पाऊल असल्याचे गैलवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)