शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

By admin | Updated: November 13, 2016 00:06 IST

कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे.

प्राचीन काळापासून परंपरा कायम : पाच दिवस गुंजणार मंगलाष्टकेचांदूरबाजार : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे. प्राचीन रितीरिवाजानुसार तुळशीच्या विवाहानंतरच सामान्यत: विवाह सोहळ्याला सुरुवात होते. आजही काही लोक कटाक्षाने या परंपरेचे पालन करताना दिसून येतात. केवळ ग्रामीण जीवनामध्येच नव्हे, तर शहरी फ्लॅट संस्कृतीमध्येही तुळशीचे महत्त्व जपले जात आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी संस्कृतीतही तुळशीचे महत्त्व कटाक्षाने जपले जाते. आंगणात तुळस हा कुठल्याही घराचा अविभाज्य भाग मानला जातो. तुळशीचा विवाह हा विष्णुशी किंवा बाळकृष्णाच्या मुर्तीशी लावला जातो. त्याकरिता उस, झेंडूची झाडे किंवा कणीस असलेला ज्वारीच्या धांड्यांच्या गुडीचा मांडव केला जातो. तुळशीच्या मुळाशी बोरे, चिंच, आवळे तसेच हरभऱ्याच्या हिरवा पाला ठेवतात. तुळशी वृंदावनाला रंगकाम करून त्यावर नक्षीकाम काढून सुशोभित केले जाते. अंतरपाट विधी केली जाते. विष्णुच्या या जागृतीचा उत्सव काळात प्रबोधन उत्सव व तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. तुळशीला उभ्या मंजिरी येतात. तुळसीचा रस त्वचारोगावर गुणकारी आहे. वातावरणातील दूषित वायू शोषण करून प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख झाडांत तुळशीचे श्वास सर्वात वरचे आहे. तुळशी विवाहानिमित्ताने या बहुपयोगी व गुणकारी वनस्पतीचे रोपन व संवर्धन केले जात असल्याची प्रथा आजही सुरू सुरू आहे. एक उत्कृष्ठ वनौषधीचे योग्य जतन करण्याकरिता कदाचित आपल्या पूर्वजांनी तुळशी विवाहाची प्रथा पाडली असावी. (तालुका प्रतिनिधी)ज्वारीच्या हुरड्यांचा प्रसाद ग्रामीण भागात तर तुळशी विवाहाचा उत्साह आजही आढळून येतो. ज्वारीच्या कोवळ्या कणीसांचा हुरडा हातावर प्रसाद म्हणून टाकला जातो तर शहरी भागातही काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा होताना दिसतात. परंपरा थोडीफार बदलली आहे.