शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

By admin | Updated: November 13, 2016 00:06 IST

कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे.

प्राचीन काळापासून परंपरा कायम : पाच दिवस गुंजणार मंगलाष्टकेचांदूरबाजार : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे. प्राचीन रितीरिवाजानुसार तुळशीच्या विवाहानंतरच सामान्यत: विवाह सोहळ्याला सुरुवात होते. आजही काही लोक कटाक्षाने या परंपरेचे पालन करताना दिसून येतात. केवळ ग्रामीण जीवनामध्येच नव्हे, तर शहरी फ्लॅट संस्कृतीमध्येही तुळशीचे महत्त्व जपले जात आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी संस्कृतीतही तुळशीचे महत्त्व कटाक्षाने जपले जाते. आंगणात तुळस हा कुठल्याही घराचा अविभाज्य भाग मानला जातो. तुळशीचा विवाह हा विष्णुशी किंवा बाळकृष्णाच्या मुर्तीशी लावला जातो. त्याकरिता उस, झेंडूची झाडे किंवा कणीस असलेला ज्वारीच्या धांड्यांच्या गुडीचा मांडव केला जातो. तुळशीच्या मुळाशी बोरे, चिंच, आवळे तसेच हरभऱ्याच्या हिरवा पाला ठेवतात. तुळशी वृंदावनाला रंगकाम करून त्यावर नक्षीकाम काढून सुशोभित केले जाते. अंतरपाट विधी केली जाते. विष्णुच्या या जागृतीचा उत्सव काळात प्रबोधन उत्सव व तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. तुळशीला उभ्या मंजिरी येतात. तुळसीचा रस त्वचारोगावर गुणकारी आहे. वातावरणातील दूषित वायू शोषण करून प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख झाडांत तुळशीचे श्वास सर्वात वरचे आहे. तुळशी विवाहानिमित्ताने या बहुपयोगी व गुणकारी वनस्पतीचे रोपन व संवर्धन केले जात असल्याची प्रथा आजही सुरू सुरू आहे. एक उत्कृष्ठ वनौषधीचे योग्य जतन करण्याकरिता कदाचित आपल्या पूर्वजांनी तुळशी विवाहाची प्रथा पाडली असावी. (तालुका प्रतिनिधी)ज्वारीच्या हुरड्यांचा प्रसाद ग्रामीण भागात तर तुळशी विवाहाचा उत्साह आजही आढळून येतो. ज्वारीच्या कोवळ्या कणीसांचा हुरडा हातावर प्रसाद म्हणून टाकला जातो तर शहरी भागातही काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा होताना दिसतात. परंपरा थोडीफार बदलली आहे.