शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी विवाहापासून लग्न मुहूर्ताचा शुभारंभ

By admin | Updated: November 13, 2016 00:06 IST

कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे.

प्राचीन काळापासून परंपरा कायम : पाच दिवस गुंजणार मंगलाष्टकेचांदूरबाजार : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीभावाने पार पाडला जाणाऱ्या तुळसी विवाहानंतरच सर्वत्र लगीनघाई सुरू होणार आहे. प्राचीन रितीरिवाजानुसार तुळशीच्या विवाहानंतरच सामान्यत: विवाह सोहळ्याला सुरुवात होते. आजही काही लोक कटाक्षाने या परंपरेचे पालन करताना दिसून येतात. केवळ ग्रामीण जीवनामध्येच नव्हे, तर शहरी फ्लॅट संस्कृतीमध्येही तुळशीचे महत्त्व जपले जात आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी संस्कृतीतही तुळशीचे महत्त्व कटाक्षाने जपले जाते. आंगणात तुळस हा कुठल्याही घराचा अविभाज्य भाग मानला जातो. तुळशीचा विवाह हा विष्णुशी किंवा बाळकृष्णाच्या मुर्तीशी लावला जातो. त्याकरिता उस, झेंडूची झाडे किंवा कणीस असलेला ज्वारीच्या धांड्यांच्या गुडीचा मांडव केला जातो. तुळशीच्या मुळाशी बोरे, चिंच, आवळे तसेच हरभऱ्याच्या हिरवा पाला ठेवतात. तुळशी वृंदावनाला रंगकाम करून त्यावर नक्षीकाम काढून सुशोभित केले जाते. अंतरपाट विधी केली जाते. विष्णुच्या या जागृतीचा उत्सव काळात प्रबोधन उत्सव व तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. तुळशीला उभ्या मंजिरी येतात. तुळसीचा रस त्वचारोगावर गुणकारी आहे. वातावरणातील दूषित वायू शोषण करून प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख झाडांत तुळशीचे श्वास सर्वात वरचे आहे. तुळशी विवाहानिमित्ताने या बहुपयोगी व गुणकारी वनस्पतीचे रोपन व संवर्धन केले जात असल्याची प्रथा आजही सुरू सुरू आहे. एक उत्कृष्ठ वनौषधीचे योग्य जतन करण्याकरिता कदाचित आपल्या पूर्वजांनी तुळशी विवाहाची प्रथा पाडली असावी. (तालुका प्रतिनिधी)ज्वारीच्या हुरड्यांचा प्रसाद ग्रामीण भागात तर तुळशी विवाहाचा उत्साह आजही आढळून येतो. ज्वारीच्या कोवळ्या कणीसांचा हुरडा हातावर प्रसाद म्हणून टाकला जातो तर शहरी भागातही काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा होताना दिसतात. परंपरा थोडीफार बदलली आहे.