शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST

अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ...

अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाची चांगली अंमलबजावणी करून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

१८ जानेवारी ते १७ फेब्रवारी २०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित विभागाने करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता आर. एस. वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद निरवणे, प्रभारी एसीपी (वाहतूक) राहुल आठवले, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस. एम. फुरसुले, महापालिकेचे सहा. अभियंता लक्ष्मण पावडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक व नागरी संरक्षण जिल्हा समादेशक सागरसिंह कनकुरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बॉक्स :

अशी जनजागृती करण्याचे निर्देश

शासनाच्या परिपत्रकानुसार चौक सभा घेणे, रस्ता सुरक्षाविषयक बॅनर्स लावणे, माहितीत्रके, हॅन्डबिल वाटप करणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, वाहनांना रिप्लेक्टर लावणे, ब्लॅक स्पोटची, खड्ड्याची दुरुस्ती करणे, शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करणे, शाळा- महाविद्यालयांत जनजागृती करणे, वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचा समावेश करणे त्यामुळे अपघातांच्या व मृत्यूच्या संख्येत घट होईल व जीवितहानी टळेल.

बॉक्स : ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावा

रस्ता सुरक्षा अभियान राबविताना जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्याची ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावावेत, ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणावर तसेच टोलनाक्यावर आर्ट स्कुलपचरचा पुतळा उभारून त्याखाली रस्ता सुरक्षाविषयक घोषवाक्य लिहावित, अपघाताची आकडेवारी प्रसिद्ध करावी जेणेकरून ती वाहनचालकांच्या निदर्शनास येईल, असे निर्देश देण्यात आले असून वाहनचालकांनी जबाबदारीने वाहने चालवावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघातावर नियंत्रण मिळविता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.