शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST

अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ...

अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाची चांगली अंमलबजावणी करून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

१८ जानेवारी ते १७ फेब्रवारी २०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित विभागाने करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता आर. एस. वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद निरवणे, प्रभारी एसीपी (वाहतूक) राहुल आठवले, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस. एम. फुरसुले, महापालिकेचे सहा. अभियंता लक्ष्मण पावडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक व नागरी संरक्षण जिल्हा समादेशक सागरसिंह कनकुरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बॉक्स :

अशी जनजागृती करण्याचे निर्देश

शासनाच्या परिपत्रकानुसार चौक सभा घेणे, रस्ता सुरक्षाविषयक बॅनर्स लावणे, माहितीत्रके, हॅन्डबिल वाटप करणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, वाहनांना रिप्लेक्टर लावणे, ब्लॅक स्पोटची, खड्ड्याची दुरुस्ती करणे, शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करणे, शाळा- महाविद्यालयांत जनजागृती करणे, वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचा समावेश करणे त्यामुळे अपघातांच्या व मृत्यूच्या संख्येत घट होईल व जीवितहानी टळेल.

बॉक्स : ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावा

रस्ता सुरक्षा अभियान राबविताना जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्याची ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावावेत, ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणावर तसेच टोलनाक्यावर आर्ट स्कुलपचरचा पुतळा उभारून त्याखाली रस्ता सुरक्षाविषयक घोषवाक्य लिहावित, अपघाताची आकडेवारी प्रसिद्ध करावी जेणेकरून ती वाहनचालकांच्या निदर्शनास येईल, असे निर्देश देण्यात आले असून वाहनचालकांनी जबाबदारीने वाहने चालवावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघातावर नियंत्रण मिळविता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.