शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

गणेश विसर्जनाला प्रारंभ

By admin | Updated: September 8, 2014 00:54 IST

गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.

अमरावती : गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला असून रविवारी १२० मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. यामध्ये शहरातील १८ व जिल्ह्यातील १०२ मंडळाचा समावेश होता.यावर्षी शहरात ५१४ सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली. यामध्ये ३६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’चा समावेश आहे. ग्रामीण भागात ११६४ सार्वजनिक गणेश मंडळानी बाप्पांची स्थापना केली. त्यात १५५१ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ंचा समावेश आहे. भक्तांनी आनंदाने दहा दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देणे सुरु झाले आहे. विसर्जनादरम्यान शहरासह जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. छत्री तलाव व प्रथमेश तलाव येथे सावर्जनिक गणेश मंडळांच्या मुर्तीच्या विसर्जनाची सोय केली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १४ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन होणार असून यामध्ये सोमवारी २१२, मंगळवारी १९०, गुरुवारी ७५, शुक्रवारी १६, शनिवारी ०२ व रविवारी एका मंडळांचा समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून भक्तगण सर्वत्र बाप्पांना अखेरचा निरोप देत आहे. गणेश विसर्जनादरम्यान शांतता भंग न होता आनंदाने बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्तजिल्ह्यामध्ये २९ आॅगस्ट रोजी गणेशाची उत्साहात स्थापन करण्यात आली. आता गणेश स्थापनेला १० दिवस पूर्ण झाले असून गणेशाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजता गणेश विसर्जनाचा मुहूर्त असल्याचे पंडित नितीन हळवे यांनी सांगितले. रविवारी दुपारी २.२९ वाजतापासून अनंत चर्तुदशीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रविवारपासूनच गणेश विसर्जनाला भाविकांनी सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी १०.४६ वाजताच्या मुहूर्ताची तिथी सुर्याने बघितलेली आहे. त्यामुळे सकाळी १०.४६ च्या मुहूर्तावर गणपती मूर्ती हलवून दिवसभरात कधीही गणेश विर्सजन करता येऊ शकते, असे हळवे गुरुजींनी सांगितले.