शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कुलसचिवांना उशिरा सुचले शहाणपण

By admin | Updated: August 23, 2014 23:42 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

खळबळ : कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्षअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी कुलगुरु मोहन खेडकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या लहरीपणावर बंदी लावण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्या अनुषंगाने कार्यालयीन सूचनेचे पत्र सर्व विभाग प्रमुखांना देऊन कर्मचाऱ्यांना सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहाण्याचे फर्मान सोडले होते. या सूचनेवरुन तोच धागा घरुन कुलसचिव डी. के. जोशी यांनी सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंद वहीची पाहणी सुरु केली आहे. त्यामुळे कुलसचिव स्वत:च उशिरा येतात. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांकडून वेळेवर उपस्थित राहण्याची अपेक्षा करीत आहेत, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षमतेचा बोजबारा वाजल्याचे चित्र आहे. अनेक वेळा विद्यापीठाविरुध्द ताशेरे ओढले जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यावर लागलेले विविध आरोप, कुलसचिवांचे कारनामे, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, आॅनलाईन प्रक्रिया, बिंदू नामावली प्रलंबित, पत्रकारावर वॉच, कर्मचाऱ्यांच्या अपमान, मराठी भाषकांचा अपमान, संगणक घोटाळा, विद्यार्थ्यांच्या समस्या अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात विद्यापीठ सापडले आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाचा कामकाज सुरळीत न झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता कुलसचिवांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले असून कर्मचाऱ्यांचे हजेरी नोंदवही तपासणी केली जात आहे.मागील कित्येक वर्षांपासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. रिक्त पदे तसेच पद्दोन्नतीकडे अजूनही दुर्लक्षच आहे, अशा अनेक बाबींवर लक्ष वेधण्याचे सोडून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. विद्यापीठात कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे,हे विषेश. (प्रतिनिधी)