शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन महिन्यांत अपघातात तीन चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:33 IST

चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले.

ठळक मुद्देचांदूररेल्वे मार्गावरील घटना : गतिरोधकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव

आॅनलाईन लोकमतपोहरा बंदी : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले. गत दोन महिन्यांत आतापर्यंत तीन चितळ ठार झाल्याने वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका वाढला आहे.चांदूररेल्वे-अमरावती मार्गावर वनक्षेत्रातून रस्ता ओलांडताना या मार्गावर वनखंड ४१ क्रमांकाच्या वनक्षेत्र परिसरात दोन महिन्यांत एक नर, दोन मादी असे तीन चितळ आतापर्यंत ठार झाले आहेत. या वनक्षेत्रातून पाण्यासाठी भटकणाऱ्या चितळांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमुळे वनविभाग सजग झाला आहे. ही घटना घडताच चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी घटनास्थळ गाठले. चिरोडीचे वनपाल एम.के. निर्मळ, वनरक्षक राजन हिवराळे यांनी पंचनामा करून चितळाचे शवविच्छेदन केले. वनक्षेत्रात मृत चितळाचा दफनविधी करण्यात आला असून, पशुवैद्यकीय अधिकारी घाटोळे यांनी शवविच्छेदन केले.चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर एका महिन्यात तीन चितळांना अपघातात प्राण गमवावे लागले. देवनदी ते चिरोडी या एक किमीच्या अंतरावर वनविभागाने गतिरोधक प्रस्तावित केले आहे. चिरोडी या राखीव जंगलात वन्यपशूंची संख्या वाढीस लागली आहे. वन्यपशूंचा रस्ते अपघातापासून बचाव व्हावा, यासाठी वन्यक्षेत्रातील अमरावती-चांदूररेल्वे राज्य मार्गावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागाने सादर केलेला आहे. नवीन सावंगा फाटा, देवनदी, गोडने महाराज आश्रम, विठोबा सावंगा फाटानजीक रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केली आहे.राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसºया क्षेत्रात मुक्त विहार करताना वन्यपशूंना राज्य मार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना वन्यपशूंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राखीव जंगलात वन्यपशूंच्या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र देऊन तसे कळविले आहे.चांदूररेल्वे राज्य मार्गावरच राखीव जंगल आहे. वन्यक्षेत्रातून जाणाºया रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे कळविले आहे.- आशिष कोकाटे,वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे