शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नऊ पालिकांचे अंतिम चित्र आज होणार स्पष्ट

By admin | Updated: November 11, 2016 00:27 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र

निवडणूक : अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवसअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदाच्या एकूण १९८ जागांसाठी १ हजार १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर नगराध्यक्षपदाच्या ९ जागांकरिता ९४ उमेदवारी अर्ज आले होते. आता ११ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी सांयकाळी उशिरापर्यंत निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, शेंदुरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगांव रेल्वे या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यामुळे यापालिकांच्या क्षेत्रात राजकीय वातावरण तापत आहे. नऊ नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी १९८ जागांवर उमेदवार निवडून द्यायचे आहेत. विशेष म्हणजे ंयंदा पालिका निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात प्रमुख राजकीय पक्षासह इतर पक्ष व स्थानिक आघाड्यांचा समावेश आहे. यासोबतच नगरसेवकपदासाठी अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उमेदवार उभे केले आहेत. सद्यस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ९४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. तर नगरसेवकपदासाठी १ हजार १४१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र, आता निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस उजाडल्याने नगरपालिकांमध्ये बंडोबांची मनधरणी केली जात आहे. एकंदर निवडणुकीसाठी नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांपैकी कितीजण माघार घेतात, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उद्या या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने विविध राजकीय पक्ष आराखडेही मांडतील व प्रचाराला गती येईल. निवडणुकीची रणधुमाळीच खऱ्या अर्थाने शुक्रवारी उमेदवारांच्या माघारीनंतर स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)