शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

-तर वाचली असती लाखभर संत्राझाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:32 IST

चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.

ठळक मुद्दे‘चारघड’चे पाणी मिळालेच नाही : अनिल बोंडे यांची चुप्पी; उत्पादकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.सन २००६ मध्ये चारघड प्रकल्पावर असलेल्या गावांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार केला. यात एका तरुणाने प्राण गमावला. आता मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भूजलस्तर खालावला. यामुळे मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना आदी गावांमधील विहिरींचे पाणी आटले. पिण्याचेही पाणी उपलब्ध नसल्याचे पाहून चारघड धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली होती. दुसरीकडे यंदा तिवसा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करताच त्याला डॉ. बोंडे यांनी प्रचंड विरोध दर्शवला. येत्या काही वर्षांमध्ये पाण्याचा संघर्ष तीव्र होत जाणार आहे. यात मात्र शेतकºयांचे मरण होणार असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ना. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.पाण्याच्या विषयावर राजकारण गैरचवर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे काही गावांना दिलासा मिळाला खरा; पण यातून झालेले राजकारण सर्वसामान्यांना भावले नसल्याचे रोखठोक मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.संत्रा वाळला; जबाबदार कोण?मुळात प्रश्न आहे तो पाण्याचा नियोजनाचा. डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. त्यांच्याच मोर्शी मतदारसंघात पाण्याच्या नियोजनाअभावी चारघड धरणाच्या परिसरातील लाखांवर संत्र्याची झाडे वाळली. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चारघड धरणात पाणी असतानादेखील संत्र्याची झाडे जगवण्यासाठी ते का सोडण्यात आले नाही, असा सवाल नितीन देशमुख यांनी केला आहे.