शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

-तर वाचली असती लाखभर संत्राझाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:32 IST

चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.

ठळक मुद्दे‘चारघड’चे पाणी मिळालेच नाही : अनिल बोंडे यांची चुप्पी; उत्पादकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.सन २००६ मध्ये चारघड प्रकल्पावर असलेल्या गावांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार केला. यात एका तरुणाने प्राण गमावला. आता मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भूजलस्तर खालावला. यामुळे मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना आदी गावांमधील विहिरींचे पाणी आटले. पिण्याचेही पाणी उपलब्ध नसल्याचे पाहून चारघड धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली होती. दुसरीकडे यंदा तिवसा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करताच त्याला डॉ. बोंडे यांनी प्रचंड विरोध दर्शवला. येत्या काही वर्षांमध्ये पाण्याचा संघर्ष तीव्र होत जाणार आहे. यात मात्र शेतकºयांचे मरण होणार असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ना. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.पाण्याच्या विषयावर राजकारण गैरचवर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे काही गावांना दिलासा मिळाला खरा; पण यातून झालेले राजकारण सर्वसामान्यांना भावले नसल्याचे रोखठोक मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.संत्रा वाळला; जबाबदार कोण?मुळात प्रश्न आहे तो पाण्याचा नियोजनाचा. डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. त्यांच्याच मोर्शी मतदारसंघात पाण्याच्या नियोजनाअभावी चारघड धरणाच्या परिसरातील लाखांवर संत्र्याची झाडे वाळली. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चारघड धरणात पाणी असतानादेखील संत्र्याची झाडे जगवण्यासाठी ते का सोडण्यात आले नाही, असा सवाल नितीन देशमुख यांनी केला आहे.