शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

शेवटचा दिवस आज, ऑफलाईनही स्वीकारणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

(लोगो) अमरावती : सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने इंटरनेटची गती कमी झाल्याच्या व सर्व्हरमध्ये अडचणी ...

(लोगो)

अमरावती : सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने इंटरनेटची गती कमी झाल्याच्या व सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. बुधवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने कोणीही इच्छूक वंचित राहू नये, यासाठी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतच पारंपरिक पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची वेळ देखील ५.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आयोगाने मंगळवारी स्पष्ट केेले.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. यामध्ये तीन दिवस सार्वत्रिक सुट्या आल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्जांची संख्या वाढली. अर्ज दाखल करीत असताना सोमवारी अनेक ठिकाणी इंटरनेटची गती कमी, सर्व्हरला अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. या तांत्रिक दोषांमुळे इच्छुक उमेदवार वंचित राहू नये, त्यांनाही निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, यासाठी आता पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध ठरलेले ऑफलाईन अर्ज संगणक प्रणालीमध्ये दाखल केले जातील.

३० डिसेंबरला शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५.३० पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

बॉक्स

मार्चमधील प्रक्रियेतील बँक खाते ग्राह्य

उमेदवारी अर्जासोबत शेड्यूल्ड बॅकेत स्वतंत्र खाते उघडण्यात यावे. याच खात्यामधून निवडणुकीचा खर्च करण्यात यावा, असे निर्देश आहेत. याशिवाय जिल्हा बँकेच्या खात्यासदेखील आयोगाच्या २४ डिसेंबरच्या पत्रान्वये मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात ५२४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मार्च महिन्यात स्थगित करण्यात आली होती. यावेळचे बँक खात्यातून निवडणूक खर्च करण्यास यापूर्वी परवानगी नव्हती. मात्र, आयोगाद्वारे मंगळवारी या खात्यामधून खर्च करण्यास मुभा दिलेली आहे.