शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:03 IST

शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली.

सोयाबीन वड्यांच्या भाजीमुळे प्रकार उघडकीसअमरावती : शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली. बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांना जेवणात दिल्या गेलेल्या सोयाबीन वड्यांच्या भाजीत चक्क अळ्या आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला व खळबळ उडाली.शासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी प्रसंगी मंत्री देखील दौरे व इतर कामांसाठी शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबतात. वर्षभर येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन सुरू असते. येथे येणाऱ्या आगंतुकांना विश्रामगृहात योग्य त्या सोयी पुरविण्यात येतात. निवासासोबतच जेवणाचीही सोय याठिकाणी आहे. येथील कामकाजासाठी काही खासगी कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनाही दुपारचे जेवण संबंधित कंत्राटदारामार्फत मोफत दिले जाते. मात्र, हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील खासगी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एफडीएकडे तक्रारअमरावती : बुधवारी काही खासगी कर्मचारी दुपारचे जेवण घेत असताना त्यांना भाजीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. त्यांनी एफडीएचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. सूरज भातकुले, विजय चौखंडे, प्रकाश जाधव, अंकुश गुडधे, सलमान पठाण, शेख जमीर, अजय खंडाईत, सुशील वानखडे, अमोल सावळे, जगदीश माहुरे, यशोदीप पंडित, निरंजन तायडे, दिपील गीरे आदींचा तक्रारकर्त्यांमध्ये समावेश आहे. यातक्रारींच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासनाचे प्रभारी सहआयुक्त जयंत वाणे व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ‘व्हीआयपीं’ना सुद्धा निकृष्ट जेवण शासकीय विश्रामगृहात मंत्री व शासकीय अधिकारी सुद्धा जेवण करतात. त्यांनाही असेच निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार शासकीय विश्रामगृहातील जेवणाचे कंत्राट हे मुंबईच्या ‘शताक्षी इंटरप्राईजेस’ची एक जबाबदार व्यक्ती चार वर्षांपासून चालवित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षांपासून अनेकदा जेवणात खडे व अळ्या आढळल्या आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार सुद्धा जडले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश जाधव नामक कर्मचाऱ्याला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. अतिसार व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने प्रकाश हे त्यावेळी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनीही अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगितल्याचे प्रकाश जाधव यांचे म्हणणे आहे.