शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:03 IST

शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली.

सोयाबीन वड्यांच्या भाजीमुळे प्रकार उघडकीसअमरावती : शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली. बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांना जेवणात दिल्या गेलेल्या सोयाबीन वड्यांच्या भाजीत चक्क अळ्या आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला व खळबळ उडाली.शासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी प्रसंगी मंत्री देखील दौरे व इतर कामांसाठी शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबतात. वर्षभर येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन सुरू असते. येथे येणाऱ्या आगंतुकांना विश्रामगृहात योग्य त्या सोयी पुरविण्यात येतात. निवासासोबतच जेवणाचीही सोय याठिकाणी आहे. येथील कामकाजासाठी काही खासगी कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनाही दुपारचे जेवण संबंधित कंत्राटदारामार्फत मोफत दिले जाते. मात्र, हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील खासगी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एफडीएकडे तक्रारअमरावती : बुधवारी काही खासगी कर्मचारी दुपारचे जेवण घेत असताना त्यांना भाजीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. त्यांनी एफडीएचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. सूरज भातकुले, विजय चौखंडे, प्रकाश जाधव, अंकुश गुडधे, सलमान पठाण, शेख जमीर, अजय खंडाईत, सुशील वानखडे, अमोल सावळे, जगदीश माहुरे, यशोदीप पंडित, निरंजन तायडे, दिपील गीरे आदींचा तक्रारकर्त्यांमध्ये समावेश आहे. यातक्रारींच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासनाचे प्रभारी सहआयुक्त जयंत वाणे व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ‘व्हीआयपीं’ना सुद्धा निकृष्ट जेवण शासकीय विश्रामगृहात मंत्री व शासकीय अधिकारी सुद्धा जेवण करतात. त्यांनाही असेच निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार शासकीय विश्रामगृहातील जेवणाचे कंत्राट हे मुंबईच्या ‘शताक्षी इंटरप्राईजेस’ची एक जबाबदार व्यक्ती चार वर्षांपासून चालवित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षांपासून अनेकदा जेवणात खडे व अळ्या आढळल्या आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार सुद्धा जडले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश जाधव नामक कर्मचाऱ्याला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. अतिसार व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने प्रकाश हे त्यावेळी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनीही अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगितल्याचे प्रकाश जाधव यांचे म्हणणे आहे.