शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:03 IST

शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली.

सोयाबीन वड्यांच्या भाजीमुळे प्रकार उघडकीसअमरावती : शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली. बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांना जेवणात दिल्या गेलेल्या सोयाबीन वड्यांच्या भाजीत चक्क अळ्या आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला व खळबळ उडाली.शासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी प्रसंगी मंत्री देखील दौरे व इतर कामांसाठी शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबतात. वर्षभर येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन सुरू असते. येथे येणाऱ्या आगंतुकांना विश्रामगृहात योग्य त्या सोयी पुरविण्यात येतात. निवासासोबतच जेवणाचीही सोय याठिकाणी आहे. येथील कामकाजासाठी काही खासगी कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनाही दुपारचे जेवण संबंधित कंत्राटदारामार्फत मोफत दिले जाते. मात्र, हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील खासगी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एफडीएकडे तक्रारअमरावती : बुधवारी काही खासगी कर्मचारी दुपारचे जेवण घेत असताना त्यांना भाजीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. त्यांनी एफडीएचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. सूरज भातकुले, विजय चौखंडे, प्रकाश जाधव, अंकुश गुडधे, सलमान पठाण, शेख जमीर, अजय खंडाईत, सुशील वानखडे, अमोल सावळे, जगदीश माहुरे, यशोदीप पंडित, निरंजन तायडे, दिपील गीरे आदींचा तक्रारकर्त्यांमध्ये समावेश आहे. यातक्रारींच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासनाचे प्रभारी सहआयुक्त जयंत वाणे व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ‘व्हीआयपीं’ना सुद्धा निकृष्ट जेवण शासकीय विश्रामगृहात मंत्री व शासकीय अधिकारी सुद्धा जेवण करतात. त्यांनाही असेच निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार शासकीय विश्रामगृहातील जेवणाचे कंत्राट हे मुंबईच्या ‘शताक्षी इंटरप्राईजेस’ची एक जबाबदार व्यक्ती चार वर्षांपासून चालवित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षांपासून अनेकदा जेवणात खडे व अळ्या आढळल्या आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार सुद्धा जडले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश जाधव नामक कर्मचाऱ्याला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. अतिसार व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने प्रकाश हे त्यावेळी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनीही अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगितल्याचे प्रकाश जाधव यांचे म्हणणे आहे.