शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

द्रुतगती महामार्गासाठी जमीन देणार नाही

By admin | Updated: August 22, 2016 00:07 IST

नागपूर-मुंबई द्रुतगती शिघ्र संचार महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणास शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या...

शेतकरी ठाम : नांदगावच्या शेतकरी सभेत एकमुखी निर्णयनांदगाव खंडेश्वर : नागपूर-मुंबई द्रुतगती शिघ्र संचार महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणास शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सभेत विरोध दर्शविणारा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या शेतकरी सभेला बहुतांश राजकीय पक्षाचे नेते मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणास संमती न देण्याचा ठरावही सभेत घेण्यात आला.सन २०१३ च्या भूमी अधिग्रहण कायद्याने शेतकऱ्यास जमीन अधिग्रहणाबाबत संमतीचा अधिकार दिला असून ७० टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी संमतीची आवश्यकता असते. पण शेतकऱ्यांना लोभाच्या योजनेचे गाजर दाखवून त्यांचा कायदेशीर अधिकाराला बगल देण्यात येत आहे, असा सूरही काही वक्त्यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, तुकाराम भस्मे, प्रमोद तऱ्हेकर, पांडुरंग ढोले, अभिजित ढेपे, प्रकाश मारोटकर, वाशिमचे नरेंद्र राऊत, शेतकरी संघटनेचे गजानन अहमदाबादकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशवराव तांदुळरकर व रघुपती गावंडे होते. कार्यक्रमाचे संचालन सुनील मेटकर व आभार प्रदर्शन पंडितराव ढोके यांनी केले.नागपूर-मुंबई शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग जमीन अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती शिवणी (रसुलापूर) च्यावतीने या शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शेतकरी सभेला नितीन टाले, विजय गावंडे, सरपंच मधुकर कोठाळे, गजानन खोडे, भानुदास मंदुरकर, उद्धव वारवे, विनोद जगताप, मिलिंद कडू, विनोद जोशी, नारायण भगवे, सुरेंद्र दांडगे, संजय गावंडे, हरिदास लिचडे, अमोल राजकुले, रवि आगळे तसेच नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जमीन अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती शिवाणी रसुलापूरची मंडळी व परिसरातील शेतकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)लोभाचे गाजर दाखवून जमिनी घेण्याचा प्रयत्ननागपूर-मुंबई या द्रुतगती शिघ्रसंचार महामार्गासाठी जमिनी न देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून त्यांच्याकडून जमिनी काढून घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. शेतकऱ्यांच्या कायदेशीर अधिकाराला बगल देण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या जमीन अधिग्रहणाविरुद्ध तालुक्यातील शेतकरी एकवटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जमिनी या महामार्गासाठी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.