शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

गणोरीच्या पेढी प्रकल्पग्रस्तांचे राणांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:09 IST

निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, ...

मोबदल्यातील तफावत दूर करा : आमदारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आ. रवि राणा यांना दिले. राणांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात बैठक बोलविण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. निम्नपेढी प्रकल्पासाठी गणोरी येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी सन २०११ मध्ये अत्यल्प म्हणजे १ लाख १० हजार एकराप्रमाणे मोबदला देऊन अधिग्रहित करण्यात आल्यात. परंतु अलीकडच्या काळात या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधारकांना ११ लाख ८० हजार रूपये एकराप्रमाणे मोबदला दिला जात आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा आरोप गणोरीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केला असून ही मोठी तफावत भरून काढावी व सध्याच्याच दराने आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणी आ. राणांना सादर निवेदनातून केली आहे. आ.राणा लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून गणोरीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. निवेदन देताना सोपान टेकाडे, संदीप देशमुख, नामदेव टेकाडे, विनायक ठोंबरे, विनायक जंगले, अनिल देशमुख, रेहानाबी मस्तान खाँ, मनोज जंगले, दिनकर जोंजाळे, आशिष कावरे, सैफुल्ला खाँ पठाण, दिलीप देशमुख आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.